Sadguru Wamanrao Pai Quotes: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. आज 29 मे रोजी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने पाहूया त्यांनी सांगितलेल्या नशीब घडवणाऱ्या 9 पायऱ्या. नशीब हे आपणच आपलं घडवू शकतो. त्यामुळे जीवनात आनंद हवा की दुःख हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. त्यामुळे नशीब घडवताना कोणत्या 9 पायऱ्या महत्त्वाच्या आहेत, हे समजून घेऊया.
नशीब घडवत असताना आपल्या परिस्थितीचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे परिस्थिती असेल तसे नशीब घडते असा विचार न करता. परिस्थिती बदलण्याचे पूर्ण सामर्थ आपल्यात आहे. असा विचार मांडून सद्गुरुंनी प्रयत्नवादाला महत्त्व दिलं आहे. त्यामुळे तुम्ही परिस्थितीचा स्वीकार करायला हवा.
परिस्थितीनुसार आपल्या जीवनात संगत घडते. संगीतचं महत्त्व सद्गुरुंनी अनेकदा पटवून दिलं आहे. संगत धरताना माणसाने कायम सावध राहायला हवे. कारण संग तसा जीवनाला रंग. फक्त लहानांनीच नाही तर मोठ्यांनी देखील आपल्या जीवनात संगत धरताना सावध राहायला हवं, असं सद्गुरु वामनराव पै सांगतात.
संस्कार हे ठरवून केले जात नाहीत, तर ते होत असतात. त्यामुळे संस्कार होताना आपण सावध राहायला हवं. उदाहरणार्थ पालकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. मुलांसमोर आपण काय वागतो याचा विचार पालकांनी केला पाहिजे. तसेच मुलांसमोरच नाही तर जीवनात जगताना संस्कारांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे आपण कसे वागतो हे अतिशय महत्त्वाचे आहे.
वासना ही परिस्थिती-संगत-संस्कारातून निर्माण होत असते. वासना ही तुमच्या विचारातून घडते. वासनेवर मागील ती गोष्टींचा परिणाम होत असतो. अशावेळी तुम्ही सकारात्मक परिस्थिती-सकारात्मक संगत आणि सकारात्मक संस्कारात घडत असाल तर वासना चांगलीच सकारात्मक निर्माण होते.
आता राहिला प्रश्न जर वरील चार गोष्टी नकारात्मक किंवा पुरक नसतील तर काय? तर अशावेळी सद्गुरु सांगतात की, विचार यावरील चार गोष्टींना पुरक बनवण्याचे सामर्थ्य ठेवते. जर तुम्ही विचार चांगला केला तर वरील चार गोष्टी चांगल्या घडू शकतात. आणि या विचारांचा परिणाम तुमतं नशिब चांगल घडण्यास मदत होते.
विचारांमधून आचार घडते. तुमचे वागणे हे तुमच्या विचारांवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही अनुभवलं असेल अनेकदा चुकीचा विचार करणाऱ्या व्यक्ती चुकीचं बोलतात. त्यामुळे तुम्ही काय विचार करता हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आचार करतानाही माणसाने सावध असायला हवं.
विचार, आचार, सवयींमधून स्वभाव तयार होतो. तुम्ही जो विचार करता तसाच आचार आणि उच्चार करता. आणि हाच मग स्वभाव बनतो. तुमच्या स्वभावाचा जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. स्वभाव जर चांगला करायचा असेल तर वरील गोष्टी चांगल्या करणे गरजेचे आहे.
सवयींवर आचाराचा मोठा परिणाम आहे. सवय ही तुमच्या विचारातून तयार होत असते. सवयींचा खूप मोठा परिणाम नशिबावर असतो. त्यामुळे तुम्ही नशिब चांगल घडवायचं असेल तर चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. अनेकदा मोठ्या व्यक्तींच्याबाबतीतही हे आपण अनुभवलं आहे.
वरील 8 पायऱ्यांचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो. आणि त्यातूनच नशिब घडतं. सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात त्याप्रमाणे 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या दिव्य संदेशाचा विचार केल्यास त्यासाठी वरील पायऱ्यांना विशेष महत्त्व आहे. नशिब चांगलं घडवायचं असेल तर वरील पायऱ्यांचा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
या 9 पायऱ्यांच्या मदतीने जीवन घडवत असाल तर तुम्ही उत्तम नशिब घडवू शकता. फक्त आपण कोणतीही कृती करताना 'प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची असणे' अत्यंत आवश्यक आहे. आपल्या वागण्यातून समाजाचं कसं भलं होईल हा विचार केल्यास तुमचं नशिब चांगलंच घडतं अशी 100% गॅरंटी सद्गुरु देतात.