नागराज मंजुळेंच्या दहावीच्या मार्कशिटमध्ये असं काय आहे? जाणून घेऊया.
...Nagraj Manjule 10th Marksheet: 'सैराट', 'फॅंड्री' या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घातले आहे. आज या चित्रपटांना प्रदर्शित होऊन बरीच वर्षे झाली असली तरीसुद्धा हे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. नागराज मंजुळे हे नाव यामुळेच आपल्या लक्षात राहते. दरवर्षी दहावीचा निकाल लागला की नागराज मंजुळेंची दहावीची मार्कशिट व्हायरल होते. नागराज मंजुळेंच्या दहावीच्या मार्कशिटमध्ये असं काय आहे? जाणून घेऊया.
नागराज मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1978 साली कर्माळा येथे झाला. त्यांच्या चित्रपटातील विविध सामाजिक विषयांचे वास्तविक चित्रण जगासमोर आणले. 2016 साली आलेल्या 'सैराट' या चित्रपटानं तर संपुर्ण जगाला वेड लावलं होतं. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. 'झिंगाट' हे गाणंही अख्ख्या जगात लोकप्रिय झाले होते.
नागराज मंजुळेंच्या दहावीच्या मार्कशीटची नेहमी चर्चा होत असते. त्यांनी आपली मार्कशीट सोशल मीडियात शेअर केली होती. ज्यात ते दहावीला नापास झाले होते.
नागराज मंजुळे यांनी फक्त 'सैराट', 'फॅंड्री', 'झुंड' आणि 'नाळ' फक्त हेच चित्रपट नाहीत तर त्यांनी अनेक डॉक्यूमेंटरीजही लिहिल्याही आहेत. ज्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्येही झकळल्या होत्या. त्यातील एक म्हणजे 'पिस्तुल्या' आणि दुसरी म्हणजे 'पावसाचा निबंध' ही. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांचे काम हे फक्त भारतापुरतेच मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय पटलावरही पोहचले आहे.
त्यांचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा 'झुंड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली होती. हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित होता. या चित्रपटाला अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नव्हते.
परंतु या चित्रपटातून एक वेगळी कथा आणि मांडणी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली होती. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या चित्रपटाचे समीक्षकांनीही कौतुक केले होते. त्याचसोबत या चित्रपटाला चांगले रेटिंग्सही मिळले होते.
2018 मध्ये जेव्हा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल येणार होता तेव्हा नागराज मंजुळे यांनी मार्कशिट शेअर केली होती. हे शेअर करत त्यांनी ज्या विद्यार्थ्यांचा निकाल चांगला नाही किंवा जे अनुत्तीर्ण झाले त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला होता.
नागराज यांनी शेअर केलेल्या मार्कशिटनुसार त्यावर FAIL असे लिहिले होते. दहावीच्या परीक्षेत त्यांना 38.28 टक्के गुण म्हणजेच 700 पैकी 268 गुण मिळाले आहेत.
त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ''मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर… मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही.
दहावी, बारावी, एमपीएससी., युपीएससी परीक्षा कुठलीही असो ती अंतिम कधीच नसते. यशापयशात…असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही…'', अशी त्यांनी पोस्ट लिहिली होती. त्यामुळे त्यांची प्रचंड चर्चा रंगली होती. आणि ही पोस्ट व्हायरलही झाली होती.
पास झालो म्हणजे खूप मोठा तीर मारला असं नसतं आणि नापास झालो म्हणजे आपल्यात काही खोट आहे, असंही नसतं. आनंदानं जगता येणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्याचा पास-नापास याच्याशी संबंध नसतो असे देखील नागराज यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
प्रत्येकाने आपल्या अंगी असलेल्या धाडसाला जागृत ठेवणे जास्त गरजेचे आहे. आयुष्य खूप मोठं आहे. त्याचे वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी सदैव तयार राहीले पाहीजे. त्यानंतर मार्ग आपोआप मिळत राहतो आणि यशही आपली साथ देते, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.