आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी स्त्री पुरूषांच्या नातेसंबंधावर काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे पुरूष परस्त्रीकडे आकर्षित होतो.
कमी वयात लग्न केल्याने अनेकदा वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या जाणवतात. आपण अनेक गोष्टी मागे सोडल्या अशी अनेकांच्या मनात इच्छा धारण होते आणि मग लोक विवाहबाह्य संबंधांचा विचार करू लागतात, असं चाणक्य म्हणतात.
शारीरिक समाधान न मिळाल्यानं पती आणि पत्नीमध्ये अनेकदा वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण होतो. फक्त शारिरीक संबंधच नव्हे तर मनाने आणि शब्दाने एकमेकांबद्दल उदार असणं गरजेचं आहे.
अनेक वेळा जोडीदारासोबतच्या नात्यात समाधानी असताना देखील नवरा परस्त्रीच्या प्रेमात पडतो. यशस्वी सेक्स लाईफ खूप महत्वाची आहे, अन्यथा लवकरच तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर विश्वास देखील अनेकदा नातं खराब करू शकतो.
जेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सर्व गुण आणि अवगुण दिसायला लागतात, तेव्हा विसंवादाची परिस्थिती निर्माण होते आणि भ्रमनिरास होतो. त्यामुळे अनेकदा नवरा परस्त्रीकडे आकर्षित होतो.
अनेकदा मुल न होणं हे नात्यातील दुरावा निर्माण होण्याचं प्रमुख कारण आहे. पुरुष किंवा स्त्री पालक होताच त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो. त्यावेळी दोघंही इच्छा आकांशा पूर्ण करू शकत नाही.