PHOTOS

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात भर उन्हाळ्यात धो-धो कोसळतोय धबधबा, पर्यटकांची मोठी गर्दी

राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे संकट सुरु आहे. अशातच आता भर उन्हाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

Advertisement
1/7

 पुढील आठ ते दहा दिवस पर्यटकांना या अंब्रेला फॉलचा आनंद लुटता येणार आहे. 

2/7

ऐन उन्हाळ्यात अंब्रेला फॉल प्रवाहित झाल्याने अनेकजण भंडारदरा परिसरात उन्हाळी पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत.

3/7

अंब्रेला फॉल धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले भर उन्हाळ्यातही भंडारदरा परिसराकडे वळत आहेत. राज्याच्या विविध भागातून लोक अंब्रेला फॉलचे मनमोहन दृश्य बघण्यासाठी गर्दी करत आहेत. 

4/7

भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने प्रसिद्ध असा अंब्रेला फॉल प्रवाहित झाला आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असताना अंब्रेला धबधब्यातून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी पर्यटकांना सुखावून जातेय.

5/7

पावसाळा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसर यावर्षी मात्र ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलं आहे आणि त्याला कारण ठरलय अंब्रेला फॉल.

6/7

काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र, अशातच भर उन्हाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्याची सर्वत्र चर्चा आहे.  

7/7

राज्यात मार्च महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे संकट सुरु झाले आहे. अनेक धरणांमध्ये काही प्रमाणातच पाणीसाठा शिल्ल्क राहिला आहे. 





Read More