PHOTOS

LIC, डोंबिवली अन् उद्धव-रश्मी यांची Love Story! पहिल्या भेटीमागे राज ठाकरे कनेक्शन

ial Love Story With Rashmi Patankar: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. उद्धव यांचा आज 64 वा वाढदिवस कार्यकर्त्या...

Advertisement
1/9

आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असून त्यांच्या खासगी आयुष्यामधील सर्वात खास म्हणजेच त्यांची पत्नी रश्मी ठाकरेंबरोबर त्यांची पहिली भेट कशी झाली? ती कोणी घडवून आणली? या दोघांचं लग्न कधी झालं? यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत. या दोघांची लव्ह स्टोरी फारच रंजक असून उद्धव ठाकरे हे डोंबिवलीचे जावई असल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे. याच वांद्रे टू डोंबिवली कनेक्शनसंदर्भात...

 

2/9

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज 64 वा वाढदिवस आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवताना वडीलांच्या निधनानंतर पक्ष संभाळताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास उद्धव ठाकरेंनी केला. या प्रवासामध्ये त्यांना साथ मिळाली ती रश्मी ठाकरेंची! (येथून पुढील सर्व फोटो - आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)

 

3/9

साधारणपणे अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत पडलेली फूट असो किंवा वर्षा बंगला सोडताना प्रसारमाध्यमांसमोरुन मातोश्रीवर जाणं असो रश्मी ठाकरे कायमच उद्धव ठाकरेंसोबत दिसल्या. आपल्या पतीचा साथ त्यांनी कधीच सोडली नाही. अगदी राज्याच्या फर्स्ट लेडी असताना सरकारी कार्यक्रमांपासून ते गणेशोत्सवादरम्यान जोडीने दर्शनाला जाण्यापर्यंत रश्मी ठाकरेंची साथ कायमच उद्धव ठाकरेंना मिळाली. 

 

4/9

मात्र या दोघांच्या वर्तमानाप्रमाणे त्यांच्या नात्याचा इतिहासही फार रंजक आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचं लग्न हे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लव्ह मॅरेज आहे. त्यांची लव्ह स्टोरी फारच रंजक आहे. विशेष म्हणजे या दोघांची भेट घडवून आणणाऱ्या मागील व्यक्तीचं राज ठाकरे कनेक्शनही खास आहे.

5/9

रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पहिली भेट राज ठाकरेंच्या फार जवळच्या व्यक्तीने घडवून आणली हे फार अनेकांना ठाऊक नाही.  एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मी पाटणकर राज्यातील सर्वात पॉवरफूल घराण्याच्या सुनबाई कशा झाल्या हे पाहूयात...

6/9

रश्मी ठाकरे या मुळच्या डोंबिवलीच्या असून त्यांचं माहेरचं अडनावर पाटणकर आहे. मुलुंडमधील वझे-केळकर कॉलेजमधून रश्मी ठाकरेंनी आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1987 साली त्या एलआयसीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या. त्या इथे कंत्राटी स्वरुपात नोकरी करत होत्या. 

7/9

‘एलआयसी’च्या ऑफिसमध्येच सोबत काम करणाऱ्या जयवंती ठाकरे यांच्याबरोबर रश्मी ठाकरेंची मैत्री झाली. याच जयवंती ठाकरे पुढे रश्मी ठाकरेंचं आयुष्याला कलाटणी देण्यासाठी कारणीभूत ठरल्या. याच जयवंती ठाकरे राज ठाकरेंशी खास कनेक्शन आहे.

8/9

अल्पावधीत एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या रश्मी ठाकरे आणि जयवंती ठाकरे या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. जयवंती यांनीच रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. ज्या वेळेस या दोघांची भेट झाली त्यावेळी उद्धव ठाकरे सक्रीय राजकारणामध्ये नव्हते. ते फोटोग्राफीसाठी ओळखले जायचे. त्यांनी एक जाहिरात कंपनी सुद्धा सुरु केलेली. 

9/9

उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. उद्धव ठाकरे केवळ रश्मी ठाकरेंना भेटण्यासाठी डोंबिवलीला जायचे. या दोघांनी घरच्यांच्या संमतीने 13 डिसेंबर 1989 रोजी लग्न केलं. उद्धव आणि रश्मी यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुलं आहेत. रश्मी ठाकरे यांना कार्यकर्ते, पदाधिकारी प्रेमाने वहिनी साहेब म्हणून हाक मारतात.





Read More