a) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना द...
ज्योतिषविद्येमध्ये (astrology) दिलेल्या माहितीनुसार सूर्यास्तानंतर (Sunset) नकारात्मक शक्तींचा वास वाढतो. त्यामुळं संध्याकाळच्या वेळेत कुणालाही पैसे उसने देऊ नका. असं केल्यास गेलेली लक्ष्मी परत येत नाही.
सायंकाळच्या वेळी तुमच्या दारात किंवा तुमच्यापुढे कुणी आल्यास त्यांना रिकाम्या हातानं माघारी पाठवू नका. सायंकाळी दान करणं शुभ ठरतं.
दिवेलागणीच्या वेळी चुकूनही वाद, भांडण तंटे घालू नका. असं केल्यास घरात गरिबी बळावते.
घरात किंवा अंगणात तुळस असल्यास संध्याकाळी तिच्यापुढे दिवा लावा. यामुळं तुमच्यावर कायम लक्ष्मीची कृपा राहील.
दिवा लागताच लगेचच घराचं मुख्य दार बंद करु नका. ही वेळ लक्ष्मीच्या येण्याची असते. त्यामुळं बंद दारावरून ती माघारी परतू शकते अशी धारणा आहे. संध्याकाळच्या वेळी घरात शुभ मंत्रांचा जप करावा, चुकूनही झोपून राहू नये.
(वरील माहिती सर्वसामान्य धारणांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)