भारतीय सण हे ऋतूचक्रावर अवलंबून असतात. जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पतीच्या दिर्घायुष...
भारतीय सण हे ऋतूचक्रावर अवलंबून असतात. जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
पतीच्या दिर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत आवर्जून करतात.
हळदी कुंकूप्रमाणेच या दिवशी देखील स्त्रिया एकमेकींना सौभाग्य वाण देऊन व्रताची पूजा करतात.
एका सुपामध्ये पाच काळ्या मण्यांची माळ आणि पाच प्रकारची फळं म्हणजेच आंबा, जांभूळ, फणस आणि केळी ही फळं देखील या वाणातून दिली जातात.
या पाच फळांमागे देखील शास्त्रीय कारण दडलेलं आहे.
याचं कारण म्हणजे, आंबा, जांभूळ, फणस आणि केळी ही फळं शरीरासाठी आरोग्यदायी असल्याचं सांगितलं जातं.
पुर्वीच्या काळी स्त्रियांना चूल आणि मूल यापलीकडचं जग माहित नव्हतं. बऱ्याचदा स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असे.
या व्रताच्या निमित्ताने तरी त्यांच्या शरीराला पोषकतत्त्व मिळावी, म्हणून पाच फळ वाण म्हणून दिली जातात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )