PHOTOS

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पाणीसाठा खालावला! कोणत्या धरणात किती साठा?

मुंबईमध्ये देखील तापमानत वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. 

Advertisement
1/7

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या कडाक्यामुळे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच धरणांतील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. 

2/7

पावसाळ्याला अजून तीन महिने बाकी आहेत. अशातच आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाण्याची पातळी ही झपाट्याने कमी होत आहे. 

3/7

त्यामुळे आता मुंबईकरांना धरणांमध्ये असणाऱ्या पाणीसाठ्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं पालिकेकडून सांगण्यात येत आहे. 

4/7

मुंबईकरांना सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. ज्यामध्ये मोडक सागर, तानसा धरण, मध्य वैतरणा, विहार धरण, तुळशी धरण, अप्पर वैतरणा आणि भातसा धरण. 

5/7

सध्या काही धरणांमधील पाणीसाठा 42 टक्के झाला असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणांमधील पाणीसाठी 50 टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. 

6/7

सध्या मोडक सागर धरणांमध्ये 22 टक्के म्हणजेच 29 हजार 201 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता 1 लाख 28 हजार 925 दशलक्ष लिटर आहे. 

7/7

तर तानसा धरणाची पाणीसाठा साठवण क्षमता 1 लाख 44 हजार 80 प दशलक्ष लिटर आहे. यामध्ये सध्या 50 हजार 629 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. 





Read More