PHOTOS

विठुरायाच्या कपाळी असलेल्या चंदनाच्या टिळ्यावर काळा टिका का लावला जातो? कारण वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

...
Advertisement
1/7
विठुरायाच्या कपाळी असलेल्या चंदनाच्या टिळ्यावर काळा टिका का लावला जातो? कारण वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
विठुरायाच्या कपाळी असलेल्या चंदनाच्या टिळ्यावर काळा टिका का लावला जातो? कारण वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

विठु माउलीचे रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरी जातात. आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. असं म्हणतात भक्त विठुरायाला भेटण्यासाठी जितके आतुर असतात तितकाच आतुर विठुरायादेखील असतो. 

 

2/7

 विठुरायाच्या भाळी असलेल्या चंदनाच्या टिळाच हे सर्व सांगून जातो. पूर्ण कपाळापासून ते नाकापर्यंत चंदनाचा टिळा लावला जातो. तर त्यावर अबीराचा काळा टिका लावला जातो. पण तुम्हाला या काळ्या टिळ्याचे महत्त्व माहितीये का?

 

3/7

 एका मान्यतेनुसार, विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पंढरपूरमध्ये येतात. ते रात्पभर दर्शनाच्या रांगेत उभे असतात. पण विठुराया असे म्हणतात की, मी लोकांच्या दर्शनासाठी येथे उभा आहे. 

4/7

मी भक्तांची प्रतीक्षा करतो पण ते माझी प्रतीक्षा करतात हे मला अजिबात मान्य नाहीय. म्हणूनच पंढरीचा राजा ज्या भक्तांना रांगेत उभे राहावे लागते तो अपराध नष्ट करण्यासाठीच एक कार्य केले जाते. 

 

5/7

पंढरपूरच्या मंदिरात रात्री झाडू मारला जातो जिथे भक्तांची रांग असते तिथली माती जमा केली जाते. ती माती चाळून त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळलं जातं. त्यात अबीराचे मिश्रण टाकून हा टिळा विठ्ठलाच्या कपाळावरती लावला जातो, अशी अख्यायिका आहे. 

6/7

असा हा कनवाळू असलेला पंढरीचा राजा किती मायाळू  आहे हेच समजते. जो जगाचा पालनकर्ता आहे तो भक्तांच्या पायाची माती कपाळी लावतो. 

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More