दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का दिवाळी बरोबर 21 दिवसांनीच का साजरी केली जाते. तर चला जाणून घेऊया.
यंदा 28 ऑक्टोबरपासून दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. तर, यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसरा होता. मात्र, भारतात खरा दिवाळीचा सण लक्ष्मीपूजनाचा मानला जातो.
दसरा आणि दिवाळीमध्ये 21 दिवसांचे अंतर असते. असं म्हणतात प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केल्यानंतर ते अयोध्येत आले तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती.
प्रभू श्रीरामांना अयोध्येला श्रीलंकेतून पायी येण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागला होता. म्हणजेच 491 दिवस लागले होते.
प्रभू श्रीराम लंकेहून अयोध्येला पोहोचले तेव्हा तेथील रहिवाशांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली होती, अशी मान्यता आहे.
गुगल मॅपवरही तुम्ही हे पाहू शकता. श्रीलंकेपासून अयोध्येला पायी जाण्यासाठी प्रभू श्रीरामाला 21 दिवस लागले होते. तुम्ही गुगल मॅपवर जा तेथून सुरुवातीच्या ठिकाणी श्रीलंका टाका नंतर अयोध्या टाका.
गुगल मॅपवर अंतर 3127 किमी इतकं येईल. त्याचाच अर्थ 491 तास म्हणजेच बरोबर 21 दिवसांनी येईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)