s: जगातील सात आश्चर्यापैकी एक ताजमहाल हे मुघल सम्राट शाहजहानने पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधलं. पण तुमच्या कधी एक गोष्ट ...
भारताची शान आणि जगातील सात आश्चर्यापैकी ताज महल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. हे सात आश्चर्य पाहण्यासाठी वर्षभरात इथे लाखो पर्यटक येत असतात. यमुना किनारी पांढऱ्या संगमरमरची ही सुंदर वास्तू सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करते.
मुघल सम्राट शाहजहा यांनी त्यांची पत्नी मुमताज महल यांच्या आठवणीत ही वास्तू बांधली. मुमताज यांच्या मृत्यू 14 व्या बाळाला जन्म देताना झाला. त्यावेळी पत्नीच्या प्रेमात 1632 मध्ये ताज महाल बांधण्यास सुरवात केली. ही अद्भुत वास्तू बांधण्यासाठी 20,000 कारागिर, शिल्पकार यांना 22 वर्ष मेहनत करावी लागली.
ताज महलसाठी राजस्थानमधून पांढरे संगमरमर, तर दक्षिण भारतातून जाड दगड, तुर्की, अफगाणिस्तान आणि चीनमधून महागडे रत्न मागविण्यात आले होते.
या ताज महलमध्ये 22 खोल्या असून ते मुख्य कब्रच्या खाली बनवण्यात आले आहेत. मुघल शासनकाळात त्या बंद करण्यात आल्या. या खोल्या शेवटी 1934 मध्ये निरिक्षणच्या वेळी उघडल्या गेल्या होत्या. तेव्हापासून त्या आजपर्यंत उघडल्या गेल्या नाहीत.
या खोल्यासाठी 2022 मध्ये कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली. बीबीसी रिपोर्टनुसार हे 22 खोल्या तळघराचा भाग आहे.
ताज महाल हे पर्यटकांसाठी सकाळी 6:00 सुरु होत आणि संध्याकाळी 6.30 वाजता बंद होतं. तुम्हाला माहिती आहे का, ताज महाल परिसरात रात्रीच्या वेळी लाइट्स लावले जात नाही. यामागील कारण आजही अनेकांना माहिती नाही.
तर ताजमहाल परिसरात लाइट्स लावल्यास किडे आकर्षित होतील आणि ते किडे संगमरमरच्या भिंतीला चिपकतील. यामुळे ताजमहालचं सौंदर्याचं नुकसान होईल. त्यासोबत वायु प्रदूषणामुळे टाइल्स खराब होईल.
1997 पासून, सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीच्या वेळी दिवे वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ताजमहालची स्वच्छता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांना काही महत्त्वाची माहिती माहित असणे आवश्यक आहे.
ताजमहाल दर शुक्रवारी बंद राहतो कारण तो दिवस प्रार्थनेसाठी राखीव असतो. पर्यटकांना विशेषतः पौर्णिमेच्या रात्री प्रवेश दिला जातो. भारतीय नागरिकांसाठी प्रवेश शुल्क ₹50 आहे, तर परदेशी पर्यटकांसाठी ते ₹1,100 आहे.
ताजमहालचा मुख्य मकबरा पूर्णपणे भूमिगत आहे. यमुना नदीच्या काठावर असलेल्या या इमारतीचा पाया मजबूत करण्यासाठी मुघलांनी एका विशेष स्थापत्य शैलीचा वापर केला. ताजमहाल दिवसा पांढरा, संध्याकाळी लाल आणि चांदण्या रात्री निळा चमकतो. मुघल राजवटीच्या समाप्तीनंतर, ब्रिटीश काळात ताजमहालवर हल्ला झाला आणि त्यातील मौल्यवान रत्ने लुटण्यात आली.