Marathi News> भविष्य
Advertisement

Mahashivratri 2025 Upay : धनलाभासाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावरील ‘ही’ गुप्त गोष्ट उचला; मात्र या दिवशी चुकूनही हे काम करु नका!

Mahashivratri 2025 Upay : महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा आणि जलभिषेक करणे अतिशय शुभ मानले जाते. यादिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे, कारण ते महादेवला प्रिय आहे. यादिवशी धनलाभासाठी कुठला उपाय करावा आणि या दिवशी महादेवला नाराज करू नका.   

Mahashivratri 2025 Upay : धनलाभासाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावरील ‘ही’ गुप्त गोष्ट उचला; मात्र या दिवशी चुकूनही हे काम करु नका!

Mahashivratri 2025 Upay : माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्साह साजरा करण्यात येतो. यादिवशी माता पार्वती आणि महादेवाचा विवाह झाला होता. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला मोठा उत्साह असतो. शिवभक्तांसाठी हा दिवस अतिशय खास असतो. यादिवशी भोलेनाथाची पूजा करून शिवलिंगावर जलभिषेक करणे शुभ मानले जाते. या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार अपार संपत्ती, आनंद, समृद्धी आणि यशासाठी काही उपाय सांगितले आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगातून घेतलेल्या काही खास गोष्टी एका रात्रीत तुमचं भाग्य बदलू शकतात असं शास्त्रात सांगण्यात आलंय. 

महाशिवरात्रीचे महत्त्व!

महाशिवरात्रीचा सण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा करण्यात येतो. या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचं विवाह झाला असल्याने ही रात्र महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. कारण या दिवशी केलेली पूजा विशेष फलदायी असते. या दिवशी शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, भांग, अक्षत इत्यादी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे.

शिवपुराणानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि व्यक्तीला मोक्ष मिळतो, असा समज आहे. या दिवशी केलेले उपाय जलद परिणाम देतात आणि व्यक्तीचे भाग्य उजळवू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. 

शिवलिंगावरून ही गुप्त गोष्ट घरी आणा!

जर तुम्हाला धन, समृद्धी आणि यश हवे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक विशेष उपाय करा, असं शास्त्रात सांगितलंय. जर एखाद्या भक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला अर्पण केलेले बेलपत्र उचलले आणि स्वतःकडे ठेवले तर त्याला अपार संपत्ती, व्यवसायात यश आणि कौटुंबिक आनंद प्राप्त होतो. पूजास्थळी, तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि सर्व अडथळे दूर होतात.

बेलपत्राचे महत्त्व आणि उपयोग

बेलपत्र भगवान महादेव यांना खूप प्रिय आहे आणि ते शिवलिंगावर अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये असं म्हटलंय की जर एखाद्या भक्ताने महाशिवरात्रीच्या दिवशी खऱ्या मनाने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं आणि पूजा संपल्यानंतर ते बेलपत्र उचलून आपल्याकडे ठेवलं तर त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. 

तुमच्या तिजोरीत, पर्समध्ये, पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बेलपत्र ठेवणे शुभ मानलं जातं. हे संपत्ती वाढवते आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येपासून मुक्तता मिळते. 

महाशिवरात्रीला हे उपायही ठरतात फलदायी!

शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करा: महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाणी, दूध, गंगाजल आणि मध अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि इच्छा पूर्ण होतात.

रुद्राक्ष धारण करणे: या दिवशी रुद्राक्ष धारण करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

शिवलिंगावर तांदूळ आणि काळे तीळ अर्पण करा: हा उपाय कुंडलीतील ग्रहदोष शांत करतो आणि यशाचा मार्ग मोकळा करतो.

शिव चालीसा पठण करा: या दिवशी शिव चालीसा पठण केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद कायम राहतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी काय करू नये?

या दिवशी मांसाहारी पदार्थांचं सेवन (मांस आणि मद्य) करु नका.
खोटेपणा, कपट आणि राग टाळा.
शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नका कारण ती भगवान महादेवाला मान्य नाहीत.
कोणाशीही गैरवर्तन करू नका आणि अहंकारापासून दूर रहा.
या दिवशी केस किंवा नखे ​​कापणे अशुभ मानले जाते.

महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी खूप शुभ आणि फलदायी असतो. जर या दिवशी भगवान शिव यांची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केली आणि शिवलिंगाला अर्पण केलेले बेलपत्र सोबत ठेवले तर ते व्यक्तीचे भाग्य उजळवू शकते. तसंच, या दिवशी सांगितलेले इतर उपाय करून, जीवनात सुख, समृद्धी, संपत्ती आणि यश मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More