16 मार्च 2025 रोजी श्रीतुकाराम बीज आहे. या दिवशी जग्दुरु संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराज वैकुंठगमनास निघाले. आजचा दिवस हा तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो.
आम्ही जातो आमच्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ।।१।।
आजवर होतो तुमच्या गावी ।
आता कृपा असू द्यावी ।।२।।
आता कसले येणे जाणे ।
सहज खुंटले बोलणे ।।३।।
रामकृष्ण विठ्ठल बोला ।
तुका गेला वैकुंठाला ।।४।
यंदाचे 377 वे तुकाराम बीज सोहळा आहे. यावेळी देहूनगरी वारकऱ्यांनी फुलून जाते. या दिवसाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी आजही नांदुरकी हे वृक्ष हलतं असं म्हटलं जातं. काय आहे यामागची आख्यायिका.
तुकाराम बीजेचा सोहळा याचि डोळा पाहायला लाखो वारकऱ्यांनी देहूनगरीत एकच गर्दी केली आहे. तुकाराम बीज सोहळाच्या दिवशी मंदिरातील परिसरातील एक झाड थरारतं अशी आख्यायिका आहे. त्यामुळे तुकोबायांच्या दर्शनासोबत नांदुरकी झाडाचं दर्शन वारकरी घेतात.
पौराणिक आख्यायिकानुसार तुकोबायांनी समाजातील अनिष्ट रुढी परंपरेबद्दल कीर्तनाच्या माध्यामातून टीका केली होती. तुकोबायांच्या या टीकेनंतर विठूरायांना दर्शन देणे भाग पडलं. तेव्हा तुकोबांनी विठ्ठलाला तुझ्या पायाशी सेवा घडावी असा आग्रह धरला. त्यानंतर विठूरायानी तुकोबांसाठी रथ पाठवला आणि त्यानंतर तुकोबांनी ‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’ असं म्हणतं देहू नगरी सोडून वैकुंठाला गेले.
इ.स. 1609 मध्ये माघ शुद्ध पंचमी, वसंतपंचमीला जग्दगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म झाला. इ.स.1650 साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला अवघ्या वयाच्या 41 व्या वर्षी तुकोबा महाराज भगवान पंढरीरायांच्या साक्षीने सदेद वैकुंठाला गेले, असे म्हटले जाते.