Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अंपायरशी वाद नेहराला पडला महागात, मुंबई इंडियन्सलाही दंड, BCCI ने सुनावली शिक्षा

IPL 2025 : गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यानंतर आयपीएलकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं. 

अंपायरशी वाद नेहराला पडला महागात, मुंबई इंडियन्सलाही दंड, BCCI ने सुनावली शिक्षा

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Mumbai Indians VS Gujrat Titans) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात पावसाचे आगमन झाल्याने DLS Method चा वापर करण्यात आला आणि गुजरात टायटन्सने हा सामना 3 विकेटने जिंकला. मात्र या सामन्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि मुंबई इंडियन्सवर स्लो ओव्हररेटमुळे दंड ठोठावण्यात आला. यासोबतच अंपायरशी वाद घालणं गुजरात टायटन्सचा हेड कोच आशिष नेहराला (Ashish Nehra) महागात पडलं आणि  त्याला सुद्धा बीसीसीआयने शिक्षा दिली. 

मुंबई इंडियन्सवर कारवाई : 

गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यानंतर आयपीएलकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं. या निवेदनात सांगण्यात आले की, मुंबई इंडियन्सकडून स्लो ओव्हर रेट नियम संदर्भातील उल्लंघन आयपीएल 2025 मध्ये दुसऱ्यांदा झालेले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर 24 लाख रुपयांचा दंड लावला जाईल. तसेच यातील दोषी खेळाडू आणि कन्कशन सब्स्टीट्यूट सहित मुंबई संघातील प्रत्येक सदस्यावर 6 लाख रुपयांचा दंड किंवा मॅच फीच्या  25 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाईल. 

हेही वाचा आजच्या Mock Drill चा IPL ला फटका? मॅच सुरु असतानाच Lights जाणार? 'या' टीमला फटका?

 

आशिष नेहराला अंपायरशी वाद पडला महागात : 

आयपीएलद्वारे जाहीर केलेल्या निवेदनात आशिष नेहराने केलेल्या उल्लंघनाचा विशेष उल्लेख केलेला नाही. गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात पावसाने अडथळा आणला त्यामुळे सामन्यावर बराच परिणाम झाला. पावसामुळे सामना थांबला असताना गुजरात टायटन्सचा हेड कोच आशिष नेहराने अंपायरशी वाद घातला. आयपीएलने सांगितले की, 'गुजरात टायटन्सचे हेड कोच आशिष नेहरावर त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड लावण्यात आला आहे, तसेच आयपीएलच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांना एक डिमेरिट पॉइंट सुद्धा देण्यात आलं. तसेच कलम 2.20 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा दाखल केला आहे जो खेळ भावनेच्या वर्तनाविरुद्ध आचरणाशी संबंधित आहे. आशिष नेहराने मॅच रेफरीद्वारे करण्यात आलेली कारवाई स्वीकारली. 

शेवटच्या चेंडूवर गुजरातने जिंकला सामना : 

पावसाने अनेकदा व्यत्यय आणलेला हा सामना मध्यरात्रीनंतर संपला. गुजरातचा संघ 132 वर सहा बाद अशा स्थितीत असताना त्यांना शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज होती. मात्र अचानक पाऊस असल्याने खेळ थांबवण्यात आला. पावसाने व्यत्यय आणल्याने एक ओव्हर कमी करुन गुजरातच्या संघासमोर विजयासाठी 147 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं. म्हणजेच पावसानंतर टाकण्यात आलेल्या एका ओव्हरमध्ये गुजरातला 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर गुजरातने 15 वी धाव घेत विजयासहीत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं. 

 

Read More