Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पोहोचणार फायनलला? ऑस्ट्रेलिया - अफगाणिस्तान मॅचनंतर ठरणार; असं आहे समीकरण

Champions Trophy 2025 :  28 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (Australia VS Afghanistan) या दोन संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया (Team India) सोबत सेमी फायनल कोण खेळणार याच चित्र स्पष्ट होईल. जर या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर भारताला सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळावं लागणार नाही. 

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पोहोचणार फायनलला? ऑस्ट्रेलिया - अफगाणिस्तान मॅचनंतर ठरणार; असं आहे समीकरण

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ही स्पर्धा आता अधिक रोमांचक बनली आहे. टीम इंडियाने बांगलादेश आणि पाकिस्तानला धूळ चारून सेमी फायनलमध्ये स्थान मिळवलं. तर 28 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (Australia VS Afghanistan) या दोन संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया (Team India) सोबत सेमी फायनल कोण खेळणार याच चित्र स्पष्ट होईल. जर या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर भारताला सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळावं लागणार नाही. कारण नॉट आउट सामन्यात भारताचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया विरुद्ध खराब आहे. जर अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये आली तर भारताला फायनलमध्ये पोहोचणं तुलनेनं सोपं ठरेल. 

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यांमध्ये जर अफगाणिस्तानचा संघ विजयी झाला तर ते थेट ग्रुप बी मधून सेमी फायनलसाठी क्वालिफाय होतील. तसेच ग्रुप बी च्या पॉईंट्स टेबलनुसार ते दुसऱ्या नंबरवर सेमी फायनलसाठी क्वालिफाय होतील. कारण साऊथ आफ्रिकेचा नेट रन रेट हा खूप चांगला आहे. त्यामुळे त्यांचे पहिल्या क्रमांकावर राहणे निश्चित आहे. जर अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला पराभूत करतो तर तसेच टीम इंडिया न्यूझीलंडला 2 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात पराभूत करते तर सेमी फायनलचा सामना भारत - अफगाणिस्तान विरुद्ध खेळेल.  

हेही वाचा : भारत - पाकिस्तानमध्ये पुन्हा होणार सामना.... क्रिकेट फॅन्ससाठी गुडन्यूज! आशिया कपमध्ये खेळणार 3 सामने

 

अफगाणिस्तान विरोधात टीम इंडियाचा रेकॉर्ड : 

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला आहे. वनडेमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध एकूण 4 सामने खेळले आहेत. यात भारताचं वर्चस्व राहीलं असून भारताने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर अफगाणिस्तान संघाला केवळ 1 सामना जिंकण्यात यश आले. भारत - पाकिस्तान सामन्यात एक मॅच टाय झाला. रेकॉर्ड पाहता प्रत्येकवेळी भारत अफगाणिस्तानवर भारी पडला आहे. त्यामुळे भारतासाठी फायनलमध्ये पोहोचणं सोपं ठरेल. 

अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही : 

भारताने अफगाणिस्तान विरुद्ध जरी चार पैकी तीन सामने जिंकले असले तरी अफगाणिस्तानला हल्ल्यात घेऊन चालणार नाही. कारण अफगाणिस्तानचे स्पिनर गोलंदाज हे स्पर्धेत कमाल कामगिरी करत असून त्याने इंग्लंडला हरवून स्पर्धेच्या बाहेर केले. दुबईच्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानचे स्पिनर्स अधिक चांगली कामगिरी करू शकतात.  त्यामुळे भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये संपूर्ण तयारीत उतरावे लागले. 

Read More