Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ऑपरेशन सिंदूरच्या PC मधे विराट कोहलीचा उल्लेख; DGMO पाकिस्तानचं नाव घेत म्हणाले 'त्यांनी कितीही प्रयत्न...'

MoD Press Conference Virat Kohli: सैन्य दलांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा चेहरा उघड पाडला असून, भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली. यादरम्यान डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी विराट कोहलीचाही उल्लेख केला.   

ऑपरेशन सिंदूरच्या PC मधे विराट कोहलीचा उल्लेख; DGMO पाकिस्तानचं नाव घेत म्हणाले 'त्यांनी कितीही प्रयत्न...'

MoD Press Conference Virat Kohli: सैन्य दलांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. भारताची सुरक्षा यंत्रणा भेदणं पाकिस्तानसाठी अशक्य असल्याचं यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्याचा किस्सा सांगितला. तसंच निवृत्ती जाहीर करणाऱ्या विराट कोहलीचाही उल्लेख केला.

'आमचा लढा दहशतवादाविरोधात होता, पण पाकिस्तान लष्कराने....', एअर मार्शल एके भारतींनी जगासमोर आणलं सत्य

 

"आपल्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सला लक्ष्य करणे खूप कठीण आहे. विराट कोहलीने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तो माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील सामन्यादरम्यान, दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेफ थॉमसन आणि डेनिस लिली यांनी इंग्लंडच्या फलंदाजीची लाइनअप उद्ध्वस्त केली. नंतर ऑस्ट्रेलियाने एक म्हण रचली होती की - "अॅशेस टू अॅशेस, डस्ट टू डस्ट, जर थॉमस नसेल तर लिली नक्कीच असेल." जर तुम्ही लेअर पाहिल्या तर तुम्हाला मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे ते समजेल. जरी तुम्ही सर्व लेअर ओलांडल्या तरी या ग्रिड सिस्टमचा एक थर तुमच्यावर नक्कीच परिणाम करेल," असं डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं. 

'पाकिस्तान लष्कराने दहशतवादाविरोधातील लढाई आपली बनवली'

एअर मार्शल एक भारती यांनी सांगितलं की, "आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात आहे. यामुळे आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांची साथ देणं योग्य समजलं. यामुळे पाकिस्तानने ही लढाई आपली लढाई बनवली आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं". पुढे ते म्हणाले की, आम्ही दहशतवादाविरोधात कारवाई केली. भारताची सुरक्षा यंत्रणा भेदणं अशक्य आहे. पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या चिनी मिसाईल्सपण अपयशी ठरल्या आहेत. 

लेफ्टनंट जनरल राजीव घई य़ांनी यावेळी सांगितलं की, "आमच्या एअर डिफेन्स कारवाईला समजून घेण्याची गरज आहे. पहलगामपर्यंत यांचा पापाचा घडा भरला आहे. आम्ही आधीच तयारी केली होती आणि कारवाई करण्यात आली".

ऑपरेशन सिंदूरमधील मोठी अपडेट! भारताने LOC वर पाकिस्तान लष्कराच्या 40 जवानांना केलं ठार, DGMO म्हणाले 'मृतदेह मोजणं...'

 

लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, "ड्रोन आणि शस्त्रं नष्ट करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि उर्वरित ड्रोन पाडण्यात आले. मला बीएसएफचेही कौतुक करायचे आहे. गस्त घालणारे जवान आमच्या मोहीमेत सहभागी झाले आणि शौर्य दाखवत आम्हाला साथ दिली.यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवाया उद्ध्वस्त झाल्या".

व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले, "हवाई क्षेत्रासह सतत देखरेख स्थिर करण्यासाठी नौदलाचा वापर करण्यात आला. नौदल एकाच वेळी हवाई, भूपृष्ठ आणि भूपृष्ठावरील धोके शोधण्यात सक्षम होते. नौदल सतत देखरेख सुनिश्चित करण्यास सक्षम होते. अनेक सेन्सर्स आणि इनपुटचा प्रभावीपणे वापर करून आम्ही सतत देखरेख ठेवत आहोत. म्हणूनच आम्ही या धोक्यांना निष्प्रभ करू शकलो. आम्ही जास्तीत जास्त रडारचा वापर केला आणि सर्व उडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं, मग ते ड्रोन असोत किंवा लढाऊ विमान असोत."

"आमचे वैमानिक आमच्या विमानांमध्ये दिवसरात्र काम करण्यास सक्षम आहेत. आपल्या हद्दीपासून काही किलोमीटर अंतरावरही शत्रूच्या कोणत्याही विमानाला येऊ दिलं नाही. कोणतंही विमान शेकडो किलोमीटर आत येऊ शकत नाही. आम्ही आमच्या क्षेपणास्त्रविरोधी आणि विमानविरोधी तंत्रज्ञानाची पडताळणी केली. आमचे शक्तिशाली युद्ध गट निर्भयपणे काम करण्यास सक्षम होते. यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. त्यामुळे पाकिस्तानला सीमेजवळ राहण्यास भाग पाडलं गेलं," असंही त्यांनी सांगितलं. 

Read More