Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच, ५५ बॉलमध्ये ठोकले १५८ रन

दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच आहेत.

हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच, ५५ बॉलमध्ये ठोकले १५८ रन

नवी मुंबई : दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच आहेत. डीवाय पाटील टी-२० कपमध्ये हार्दिकने पाच दिवसांमध्ये दुसरं शतक केलं आहे. हार्दिकने रिलायन्स-१ कडून खेळताना बीपीसीएलविरुद्ध १५८ रनची खेळी केली. या खेळीमध्ये पांड्याने २० शानदार सिक्स आणि ६ फोर लगावले.

हार्दिक पांड्याने ५५ बॉलमध्ये १५८ रनची खेळी केली. हार्दिकच्या या खेळीमुळे रिलायन्स-१ने २३८ रनचा स्कोअर केला. या दोन शतकांसोबतच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आपण तयार असल्याचंही हार्दिकने दाखवून दिलं आहे. ३ वनडे मॅचची ही सीरिज १२ मार्चपासून सुरु होणार आहे.

हार्दिक पांड्याची या स्पर्धेतली ही तिसरी मॅच होती. याआधी मंगळवारी सीएजीविरुद्ध पांड्याने ३९ बॉलमध्ये १०५ रन केले होते. हार्दिकच्या या खेळीमध्ये ८ फोर आणि १० सिक्स होते. पांड्याने त्या मॅचमध्ये ५ विकेटही घेतल्या होत्या. स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये पांड्याने २५ बॉलमध्ये ३८ रन केले होते.

डीवाय पाटील टी-२० कपमध्ये हार्दिक पांड्याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनही खेळत आहेत. हे तिन्ही खेळाडू दुखापतीनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्याची लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Read More