Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

यशस्वी जयस्वाल-बेन स्टोक्स एकमेकांशी भिडले; एजबॅस्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानचा Photo Viral

Yashasvi Jaiswal-Ben Stokes, IND vs ENG 2nd Test: एजबॅस्टन कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि बेन स्टोक्समध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याचे दिसून याचे. या वादावादीचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.   

यशस्वी जयस्वाल-बेन स्टोक्स एकमेकांशी भिडले; एजबॅस्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानचा Photo Viral

Heated Exchange Between Yashasvi Jaiswal-Ben Stokes: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत मैदानात तापमान अचानक वाढलेले दिसले. याचे  कारण यावेळी तो हवामानामुळे नव्हे, तर यशस्वी जयस्वाल आणि इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्समधील शाब्दिक बाचाबाची हे आहे. एजबॅस्टनच्या मैदानावर पहिल्या दिवशी दोघांमध्ये रंगलेली ही भिडंत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सामन्याच्या पहिल्या सत्रात जयस्वाल आणि स्टोक्स यांच्यात काहीसं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दोघेही काहीसे  आक्रमक दिसले आणि काही क्षणांकरता आता काय होईल अशी परस्थिती दिसून आले. स्टोक्स हा आधीपासूनच त्याच्या थेट भिडणाऱ्या स्वभावासाठी ओळखले जातो त्यामुळे त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित असतेच. मात्र, जयस्वालचा संयम राखत दिलेला प्रतिसादही चाहत्यांच्या नजरेत भरला. या शाब्दिक खडाजंगीचा नक्की विषय काय होता, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र सोशल मीडियावर या प्रसंगाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. 

हे ही वाचा: IND vs ENG 2nd Test: जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत का खेळत नाहीये? कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केलं कारण

 

 

हे ही वाचा: वेस्टइंडीज क्रिकेटरवर 11 महिलांच्या बलात्काराचा आरोप; मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ' मी जज नाही. पण...'

 

भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण

एजबॅस्टन येथे टॉस जिंकून इंग्लंडच्या कर्णधाराने भारताला पहिले फलंदाजीस पाचारण केलं. स्टोक्सने स्पष्ट सांगितलं की, 'ओव्हरहेड कंडिशन्स' म्हणजे ढगाळ वातावरण लक्षात घेऊन त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

हे ही वाचा: 'भारतीय संघ त्याला कायमचा गमावू शकतो....' 'या' स्टार क्रिकेटपटूच्या पत्नीला बुमराहची चिंता, टीम इंडियाला दिली वॉर्निंग

जयस्वाल फॉर्मात, करुण नायरसोबत मजबूत भागीदारी

या बातमीच्या प्रकाशित वेळी भारताची धावसंख्या 77/1 अशी होती. के. एल. राहुल लवकर बाद झाल्यानंतर, यशस्वी जयस्वाल आणि करुण नायर यांनी डाव सावरत उत्तम भागीदारी केली. जयस्वाल 45 धावांवर तर नायर 29 धावांवर खेळत होते.

Read More