Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL चा एक सामना हरल्यावर किती रुपयांचं नुकसान होतं? समजून घ्या ‘कोट्यवधींचं गणित'

 How many amount IPL Team Owner Loss Per Match: सर्वात प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग ही केवळ एक स्पर्धा नाही तर एक मोठे व्यवसाय मॉडेल आहे. या स्पर्धेशी लाखो लोक जोडले गेले आहेत. पण यामध्ये भाग घेतलेल्या संघांसाठी फायद्यांसोबत काही तोटेही होतात.   

IPL चा एक सामना हरल्यावर किती रुपयांचं नुकसान होतं? समजून घ्या ‘कोट्यवधींचं गणित'

IPL Team Owner Loss Per Match: इंडियन प्रीमियर लीग ही जगातील स्तरावरची सर्वात प्रसिद्ध लीग आहे. क्रिकेट विश्वातील ही लीग म्हणजे केवळ स्पर्धा नसून एक कोट्यवधींचा व्यवसायही आहे. या लीगमध्ये जिथे खेळाडू मैदानात विजयासाठी झुंज देत असतात, तिथे फ्रेंचायझी मालकांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या गुंतवणुकीचं गणित सुरू असतं. लाखो-करोडोचा पैसा लावून खेळाडू खरेदी केले जातात त्यामुळे ते एक जरी सामना हरले तर संघ मालकाला तोटा होतो. एक सामना हरल्याने फक्त पॉइंट्सचं नुकसान होत नाही, तर आर्थिक तोटाही मोठा होतो.

फ्रेंचायझी म्हणजे कोट्यवधींची गुंतवणूक

प्रत्येक IPL संघाची सुरुवात होते फ्रेंचायझी खरेदीपासून. यासाठी संघ मालक कोट्यवधी रुपये मोजतात. त्यानंतर येते खेळाडूंची लिलाव प्रक्रिया. या प्रक्रियेसाठी   संघांची पर्स कोट्यवधींच्या घरात असते. त्याचा वापर करून खेळाडूंना विकत घेतले जाते. याशिवाय त्यात जोडले जाते टीम मॅनेजमेंट, ट्रेनिंग, ट्रॅव्हल, ब्रँड प्रमोशन, आणि स्पॉन्सरशीपच्या गोष्टी. या सर्व गोष्टींसाठी संघमालक दरवर्षी प्रचंड खर्च करतात. यामुळेच संघ मालकांना आपला संघ जास्तीत जास्त सामने जिंकावा असं वाटतं असते. कारण जेव्हा एखादा संघ सामना हरतो तेव्हा त्या संघ मालकाचे खूप नुकसान होते. 

हे ही वाचा: Mi प्लेऑफमध्ये पोहोचताच नीता अंबानींनी केला 'तो' इशारा, मुंबई सहाव्यांदा जिंकणार IPL Trophy?

 

IPL आहे ब्रँड व्हॅल्यू

BCCI च्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये IPL ची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 11.2 अब्ज डॉलर इतकी होती. तर 2024 मध्ये ती वाढून 16.4 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली आहे. एक सिझनमध्ये IPL ला 620 मिलियनहून अधिक प्रेक्षक मिळाले, आणि 350 अब्ज मिनिटांचा व्ह्यूइंग टाइम झाला. यावरून या लीगची कमर्शियल ताकद लक्षात येते.

हे ही वाचा: IPL 2025 Final कुठे होणार? प्लेऑफचे संपूर्ण शेड्यूल आले समोर, जाणून घ्या सविस्तर अपडेट

 

एक सामना हरला तर कशावर होतो परिणाम? 

  • जेव्हा एखादी टीम सामना हरते, तर त्याचा थेट परिणाम टिकट विक्री, स्पॉन्सरशिप डील्स आणि व्ह्यूअरशिपवर होतो.
  • स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी होते. यामुळे तिकीट विक्रीतून होणाऱ्या कमाईत थेट घट होते. 
  • टीम जिंकत नसेल, तर टीव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मॅच बघणाऱ्यांची संख्या घटते. त्यामुळे व्ह्यूअरशिपचे पैसे जातात. 
  • ब्रँड्स अशाच टीमसोबत राहतात ज्या जिंकतात आणि चर्चेत असतात. त्यामुळे हरलेल्या टीमसाठी भविष्यात स्पॉन्सर मिळवणं कठीण होऊ शकतं.
  •  एकूण कमाईतून 40-50% वाटा फ्रेंचायझींना मिळतो. कमी व्ह्यूअरशिपमुळे तो वाटा कमी होऊ शकतो.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IPL (@iplt20)

हे ही वाचा: क्रिजवरही धोनी आणि प्रेक्षकांमध्येही धोनी... कोण आहे MS Dhoni चा हा डुप्लिकेट?

लाखोंच्या पातळीवर नुकसान 

तज्ज्ञांच्या मते, एक IPL सामना हरल्याने संघाला 20 ते 50 लाख रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकतं, जसं की कमी टिकट विक्री, ब्रँड व्हिजिबिलिटी कमी होणं, आणि पर्सनल स्पॉन्सरशिपवर परिणाम होतो. 

Read More