Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित निवृत्ती घेणार का? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर हिटमॅनने स्वतःच केले स्पष्ट म्हणाला, 'मी अजून क्रिकेटमधून..."

ICC Champions Trophy 2025: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. आता याबद्दल स्वतः रोहीतनेच उत्तर दिले आहे.  

रोहित निवृत्ती घेणार का? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर हिटमॅनने स्वतःच केले स्पष्ट म्हणाला, 'मी अजून क्रिकेटमधून...

Rohit Sharma Statement on Retirement: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी (Champion Trophy 2025) आपले नाव कोरले. शेवटचा सामना ९ मार्च रोजी दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड ( IND vs NZ Final) असा रंगला. ज्यामध्ये भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल आणि संघातील त्याच्या स्थानाबाबत तर्कवितर्क लावले जात होते, पण न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात त्याची 76 धावांची खेळी त्याच्या कारकिर्दीला संजीवनी देणारी ठरली. चॅम्पियन्स ट्रॉफी च्या अंतिम सामन्यानंतर रोहित त्याच्या निवृत्तीची घोषणा करणार अशी चर्चा रंगली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर निवृत्तीबद्दलच्या सर्व चर्चांवर स्वतः रोहितने उत्तर दिले आहे.  

रोहित निवृत्त होणार? 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, "मी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेत नाही. कृपया अफवा पसरवू नका." हिटमॅनला भविष्यातील प्लॅनबद्दल विचारले असता तो म्हणाला, "भविष्यातील कोणतेही प्लॅन नाही. जे काही होत आहे ते सुरूच राहील."  

हे ही वाचा: भारताच्या विजेतेपदानंतर गावस्कर लहान मुलाप्रमाणे उड्या मारू लागले, अनोख्या सेलिब्रेशनचा VIDEO VIRAL

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

'मी काही वेगळे केले नाही' - रोहित 

रोहित शर्मा म्हणाला, "मी आज काही वेगळे केले नाही. मागच्या तीन-चार सामन्यातही मी तेच करत होतो. पॉवरप्लेमध्ये धावा काढणे किती महत्त्वाचे असते हे मला माहीत आहे, कारण आम्ही पाहिले आहे की दहा षटकांनंतर जेव्हा मैदान पसरते आणि फिरकीपटू येतात तेव्हा धावा काढणे कठीण होते." 

हे ही वाचा: Trending Quiz: भारताची ती खास नदी, जिच्या पाण्यात वाहते सोने!

 

'मला स्थिर खेळायचे होते' - रोहित 

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, "खेळपट्टी संथ होती आणि त्यामुळे धावा काढणे अधिक कठीण झाले. अशा परिस्थितीत सुरुवातीलाच चान्स घेणे आवश्यक होते. ज्या गोलंदाजाविरुद्ध मी धावा करू शकेन तो गोलंदाज मी निवडला. अशा परिस्थितीत अनेक वेळा जास्त धावा होत नाहीत. आज, दहा षटकांनंतर, मी माझ्या खेळात थोडा बदल केला कारण मला स्थिर खेळायचे होते." 

हे ही वाचा: '...म्हणूनच टीम इंडिया पाकिस्तानला जात नाही'; मोहम्मद हाफिज झाकीर नाईकसोबत दिसल्याने भारतीय संतापले

 

'विजयामध्ये योगदान दिल्याचे खूप समाधान मिळते'-  रोहित 

रोहित शर्माने कबूल केले की संघाच्या विजयात योगदान देणे खूप समाधानकारक आहे. रोहित शर्मा म्हणाला, "जेव्हा तुम्ही सामना जिंकता आणि त्यात तुमचे असते तेव्हा आणखी छान वाटते. 2019 च्या विश्वचषकातही मी योगदान दिले, पण आम्ही जिंकू शकलो नाही त्यामुळे मजा आली नाही. जर तुम्ही काही धावा केल्या आणि जिंकलात तर तुम्हाला अधिक आनंद होतो." 

हे ही वाचा: ना पाकिस्तान ना बांगलादेश... भारताच्या 'या' शेजारी देशात हिंदू मंदिर बांधायला परवानगी नाही

 

चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजय देशाला समर्पित

चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजय देशाला समर्पित करताना रोहित शर्मा म्हणाला, "हा विजय संपूर्ण देशाचा आहे कारण मला माहित आहे की देश आमच्यासोबत आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना जिंकता, विशेषत: भारतात, तेव्हा आम्हाला माहित आहे की आम्ही जिथे खेळतो तिथे आम्हाला पूर्ण पाठिंबा मिळतो." 

Read More