Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs AUS Semi-Final: उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय होईल? 'या' संघाला मिळेल अंतिम फेरीत प्रवेश

Champions Trophy: आज पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ४ मार्च रोजी दुबईत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पण या सामन्यात पाऊस पडल्यास कसे समीकरण असेल हे जाणून घेऊयात.   

IND vs AUS Semi-Final: उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय होईल? 'या' संघाला मिळेल अंतिम फेरीत प्रवेश

Champions Trophy Semi-Final: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा (ICC Champions Trophy 2025)  चांगलीच रंगली आहे. आज ४ मार्च रोजी या स्पर्धेतील पहिली उपांत्य फेरी रंगणार आहे.  आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण तीन सामने बाकी आहेत. दोन सेमीफायनल आणि एक फायनल अजून खेळायचे आहे. पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज ४ मार्च रोजी दुबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी लाहोरमध्ये न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील तीन सामन्यांना पावसाचा फटका बसला आहे. आता उपांत्य फेरीतही असे घडले तर काय होईल? चला यावर एक नजर टाकुयात... 

पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या तर... 

गट फेरीत पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. आता आज होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्येही असेच घडले तर काय होईल? उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाने गट फेरीतील तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने  बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द झाले होते. 

हे ही वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यापूर्वी आली वाईट बातमी, 'या' दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

 

पाऊस पडला तर काय होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना दुबईत होणार आहे. पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता जवळपास नाही. मात्र, उपांत्य फेरीत पाऊस पडल्यास सामना त्याच दिवशी पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. हे शक्य नसल्यास, राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता तिथून पुन्हा सुरू होईल. राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही, तर गटात अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

हे ही वाचा: S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य

 

दक्षिण आफ्रिकेला होईल फायदा? 

सध्या लाहोरमध्ये पावसाची शक्यता आहे, जिथे दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. राखीव दिवशीही हा सामना पूर्ण झाला नाही, तर ब गटात दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर असल्याने अंतिम फेरीत पोहोचेल.

हे ही वाचा: LIVE मॅचमध्ये विराट कोहली कोणाच्या पाया पडला? Viral Videoने चाहत्यांच्या मनात उपस्थित केला प्रश्न

 

आहे आणखी एक विशेष नियम

याशिवाय बाद फेरीत, डकवर्थ-लुईस नियम (DLS) नियमानुसार सामन्यांमध्ये निकाल मिळविण्यासाठी, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला किमान 25 षटके खेळावी लागतील.

Read More