Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG 1st Test : 471 रन्स करुनही भारताच्या नावावर लज्जास्पद विश्वविक्रम; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

IND vs ENG 1st Test : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात चांगली केली आहे. पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लज्जास्पद विश्वविक्रम भारताने आपल्या नावावर केला आहे.  

IND vs ENG 1st Test : 471 रन्स करुनही भारताच्या नावावर लज्जास्पद विश्वविक्रम; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

IND vs ENG 1st Test : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची जोरदार सुरुवात केली आहे. कॅप्टनशिवाय यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनीही लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळ खेळली आहे. या तिन्ही खेळाडूंच्या शतकांनंतरही भारताने केवळ 471 रन्स केले आहेत. यासोबतच टीम इंडियाच्या नावावर एक लाजिरवाणा विश्वविक्रम नावावर जोडला गेला आहे. तीन फलंदाजांनी शतकं झळकावल्यानंतर सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट होण्याचा हा विक्रम भारताच्या नावावर जोडला गेला. यापूर्वी हा विक्रम 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नावावर नोंदवला गेला होता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचेही नाव आहे. तीन फलंदाजांनी शतके झळकावूनही दोन्ही संघांना 500 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. 

इंग्लंड दौऱ्यात भारताचा कॅप्टन शुभमन गिलने सर्वाधिक 147, ऋषभ पंतने 134 आणि यशस्वी जयस्वालने 101 रन्स केले आहेत. आता पाहूयात तीन खेळाडूंनी शतकं ठोकल्यानंतरही संघाचा स्कोर हा कमी राहिला आहे. 

471 भारत विरुद्ध इंग्लंड हेडिंग्ले 2025

475 दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सेंच्युरियन 2016

494 ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हेडिंग्ले 1924

497 वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, कोलकाता 2002

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर, यजमान संघाने दिवसाच्या खेळाअखेर पुनरागमन करण्यात यश मिळवलं. भारताने दिवसाची सुरुवात 3 विकेटच्या मोबदल्यात 359 धावांवर केली. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्यानंतर, ऋषभ पंतनेही शतक ठोकले. एकेकाळी भारताची धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात 430 रन्स होते. पण कॅप्टन गिल आउट होताच संपूर्ण संघ 471 धावांवर कोसळला. स्टोक्स आणि टंगने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या.

यानंतर, इंग्लंडकडून ऑली पोपने फलंदाजीवर वर्चस्व गाजवले, ज्याने सलग दुसरे कसोटी शतक झळकावलं. नाबाद 100 धावा काढल्यानंतर तो क्रीजवर उपस्थित आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 3 विकेट गमावून 209 रन्स केले. या तिन्ही विकेट जसप्रीत बुमराहने घेतल्या. भारताकडे अजूनही 262 धावांची आघाडी आहे. दरम्यान पावसामुळे तिसऱ्या दिवशी खेळ लवकर संपला. तिसऱ्या दिवशी भारताकडे 93 धावांची आघाडी आहे. 

Read More