IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार असून शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्यांदाच टेस्ट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. 18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यादरम्यान दोन्ही संघाचे खेळाडू हातावर काली फीत बांधून उतरले. मात्र या मागचं नेमकं कारण काय याबाबत अनेकांना प्रश्न पडला.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार 20 जून पासून यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. दुपारी 3: 30 वाजता या सामन्याला सुरुवात झाली असून सामन्यापूर्वी झालेला टॉस इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला. यावेळी त्याने प्रथम गोलंदाजी निवडली आणि टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलं. टॉसनंतर दोन्ही संघांनी आपली प्लेईंग 11 जाहीर केली आणि त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात राष्ट्रगीतासाठी आले होते.
हेही वाचा : मुलींना अश्लील फोटो पाठवणाऱ्या क्रिकेटला बनवलं नवीन हेड कोच, जागतिक क्रिकेटमध्ये संघाची नाचक्की
राष्ट्रगीतासाठी मैदानात आलेल्या भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंच्या हातावर काळी फीत बांधली होती. 12 जूनला अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला या अपघातात विमानातील जवळपास 241 प्रवासी आणि स्टाफचा मृत्यू झाला. यातील काही प्रवासी हे लंडनचे नागरिक सुद्धा होते. तेव्हा अपघातात मृत पावलेल्या प्रवासांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडूंच्या हातावर काळी फीत बांधली. तसेच राष्ट्रगीताच्या पूर्वी एक मिनिटांचं मौन सुद्धा पाळण्यात आलं.
A perfectly observed minutes silence.
— England Cricket (englandcricket) June 20, 2025
This morning we remember those lost in the tragic Air India crash last week. pic.twitter.com/mEDsQPqVmH
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना : 23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट