Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

23 वर्षांनी हेडिंग्लेमध्ये झाली इतिहासाची पुनरावृत्ती! ऋषभ पंतच्या शतकानंतर झाली कमाल, नेमकं काय घडलं होतं?

Rishabh Pant Test Century : सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल यांनी शतक ठोकलं होतं, त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर ऋषभ पंतने सुद्धा धमाकेदार कामगिरी करून शतक पूर्ण केलं. यासह 23 वर्षांनी हेडिंग्समध्ये  इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. 

23 वर्षांनी हेडिंग्लेमध्ये झाली इतिहासाची पुनरावृत्ती! ऋषभ पंतच्या शतकानंतर झाली कमाल, नेमकं काय घडलं होतं?

IND VS ENG 1st Test :  भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, यावेळी सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. भारताच्या फलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून पहिल्याच इनिंगमध्ये धावसंख्या 400 पार पोहोचवली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल यांनी शतक ठोकलं होतं, त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर ऋषभ पंतने सुद्धा धमाकेदार कामगिरी करून शतक पूर्ण केलं. यासह 23 वर्षांनी हेडिंग्समध्ये  इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. 

18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार 20 जून पासून यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना प्रथम यशस्वी जयस्वालने 144  बॉलमध्ये शतक ठोकलं. या दरम्यान त्याने 16 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने देखील टीम इंडियासाठी शतकीय कामगिरी केली. त्याने 140 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने सुद्धा हीच लय कायम ठेवत शतक ठोकलं. 146 बॉलमध्ये पंतने नाबाद 105 धावांची कामगिरी केली. दरम्यान त्यानं 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. 

हेही वाचा : शुभमन आणि यशस्वीनंतर कोण ठोकणार तिसरं शतक? सचिनच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं आश्चर्यकारक उत्तर

23 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? 

वर्ष 2002 मध्ये टीम इंडियाचा संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध याच हेडिंग्स मैदानात सामना खेळत होता. यावेळी पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून फलंदाजी करताना फलंदाज राहुल द्रविड (148) , सचिन तेंडुलकर (193) आणि सौरव गांगुली (128) या तिघांनी शतकीय कामगिरी केली होती. हा सामना भारताने जिंकला होता. आज तब्बल 23 वर्षांनी याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध हेडिंग्स मैदानात खेळत असलेल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतक ठोकलं आहे. 

ऋषभ पंतचं सेलिब्रेशन : 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

Read More