IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज 20 जून पासून खेळवली जाणार असल्याने याकरता भारताचा टेस्ट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. यापूर्वी भारत ए विरुद्ध इंग्लंड लायन्स संघात दुसरा सराव टेस्ट सामना खेळवला जात असून शुक्रवारी या सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड लायन्सचा संघ 327 धावांवर आटोपला. इंडिया-ए चा गोलंदाज खलील अहमदने इंग्लंडच्या 4 विकेट्स घेऊन त्यांना ऑलआउट केले.
दुसऱ्या दिवशीचा खेळ समाप्त झाल्यानंतर इंग्लंड लायन्सने पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेटच्या गमावून 192 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला इंग्लंड लायन्सने 27 धावाच केल्या होत्या तेव्हा जॉर्डन कॉक्स 45 धावा बनवून आउट झाला. एकावेळी इंग्लंड लायन्सचा स्कोअर ३ विकेट 219 धावा असा होता. मात्र पाहता पाहता त्यांचा स्कोअर 243 धावांवर 8 विकेट असा झाला. इंग्लंडच्या संघाने 24 धावा दरम्यान 5 विकेट गमावल्या.
हेही वाचा : 'कानशिलात मारायला हवी होती...' श्रेयस अय्यर सोबतच्या वादावर शशांक सिंहने सोडलं मौन, चूक कोणाची होती?
इंडिया ए कडे संधी होती की ते पहिल्या इनिंगमध्ये 60-70 धावा करून सामन्यात धावांची आघाडी घेऊ शकत होते, मात्र इंग्लंड लायन्सने 243 धावांवर त्यांची 8 वी विकेट गमावली. शेवटच्या 2 विकेटसाठी फलंदाजांनी 84 धावांची पार्टनरशिप केली. 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या फरहान अहमदने 24 धावा केल्या. तिथेच जोश टंगने 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन 36 धावा केल्या. तर 11 नंबरवर आलेल्या फलंदाजाने 16 धावा केल्या.
टीम इंडियासाठी सर्वात जास्त विकेट खलील अहमदने घेतल्या. त्याने इंग्लंड लायन्सच्या 4 फलंदाजांना आउट केलं. बेन मॅककिनी, जॉर्डन कॉक्स, जेम्स रीव, ख्रिस वोक्स इत्यादी खलील अहमदच्या गोलंदाजीचे शिकार ठरले. अंशुल कंबोज आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी 2 विकेट, तर तनुष कोटियन आणि नितीश कुमार रेड्डी यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.