Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बदलले IND vs ENG मालिकेचे नाव, पतोडी नाही तर 'या' दोन दिग्गजांच्या नावाने दिली जाणार ट्रॉफी

India-England Test series: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पतोडी मालिकेच्या (Pataudi Trophy)  नावाने खेळल्या जाणाऱ्या मालिकेचे नाव आता बदलण्यात आले आहे.    

बदलले IND vs ENG मालिकेचे नाव, पतोडी नाही तर 'या' दोन दिग्गजांच्या नावाने दिली जाणार ट्रॉफी

IND vs ENG series Name has been changed: भारताचा संघ आता भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी कसोटी मालिका यंदा ऐतिहासिक कारणांमुळे चर्चेत आली आहे.  भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका (IND vs ENG Test Series) पूर्वी पतोडी ट्रॉफी (Pataudi Trophy) म्हणून ओळखली जात होती. पण आता तसे होणार नाहीये. आता पतोडी ट्रॉफीचे नाव बदलण्यात आले आहे.  याचा अर्थ असा की यावेळी 'भारत आणि इंग्लंड मालिका पतोडी ट्रॉफी' म्हणून खेळली जाणार नाही.  तिच्या जागी आता नवीन नाव जाहीर करण्यात आलं आहे तर आता ही मालिका सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन ट्रॉफी म्हणून खेळवली जाईल. 2007 पासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पतोडी ट्रॉफी मालिका खेळली जात होती, परंतु आता पतोडी ट्रॉफी निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून सुरू होत आहे. 

2007 पासून सुरू होती परंपरा

2007 साली जेव्हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटच्या 75 वर्ष पूर्ण झाले तेव्हा ही मालिका ‘पतोडी ट्रॉफी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. माजी भारतीय कर्णधार इफ्तिखार अली खान पतोदी आणि मन्सूर अली खान पतोदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ट्रॉफीला नाव देण्यात आले होते. मात्र, आता ती परंपरा थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा: आनंदोत्सव महागात पडला! चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरिल चेंगराचेंगरी प्रकरणी RCB आणि KSCA विरुद्ध FIR दाखल

 

नवीन ट्रॉफी – दोन महान दिग्गजांच्या नावावर 

सचिन तेंडुलकर, भारताचा सार्वधिक महान फलंदाज ज्याला क्रिकेटचा देवही म्हंटले जाते. त्याने कसोटीत तब्बल 15,921 धावा केल्या, आणि दुसरा दिग्ग्ज म्हणजे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन. जेम्स हा कसोटी क्रिकेटमधला सर्वाधिक यशस्वी फास्ट बॉलर ठरला आहे. जेम्सच्या नावावर 704 विकेट्स आहेत. आता त्याच्या नावानेही ही नवी ट्रॉफी खेळली जाणार आहे.

हे ही वाचा: Axar Patel Retirement: "माझा क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच..." अक्षर पटेलने घेतली निवृत्ती? रिटायरमेंटचा Video Viral

हे ही वाचा : " त्याच्या शरीराचे तुकडे..." चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या मुलाच्या बापाने फोडला टाहो

सुनील गावसकर मात्र नाराज

पतोडी ट्रॉफीचं नाव बदलण्यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पोर्ट्सस्टारमधील कॉलममध्ये लिहिले की, “ इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) ने इंग्लंडमध्ये होणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी पतोडी ट्रॉफी हटवण्याचा निर्णय घेतलेला खूप खेदजनक आहे. हे पतोडी कुटुंबाच्या भारत व इंग्लंडमधील क्रिकेटमधील योगदानाबाबत असंवेदनशीलतेचं उदाहरण आहे.”

Read More