Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पहिल्या टीम मीटिंगमध्ये गौतम गंभीरने विराट आणि रोहितचं नाव का घेतले? कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

IND vs ENG Test Series: पहिल्या टीम मीटिंगमध्ये गंभीरने विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विनची आठवण काढली. दरम्यान त्यांनी संघात नवीन खेळाडूंचे स्वागत केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.   

पहिल्या टीम मीटिंगमध्ये गौतम गंभीरने विराट आणि रोहितचं नाव का घेतले? कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Gautam Gambhir Emotional Speech: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. भरती संघ सध्या इंग्लडमध्ये जोरदार तयारी करत आहे. ही स्पर्धा सुरु होण्याच्या आधी टीम इंडियाने नव्या युगाची सुरुवात केली आहे. कारण यावेळी संघात जास्तीजास्त नवीन चेहरे आहेत.  विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्यासारख्या अनुभवी दिग्गजांच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच एक पूर्णपणे नवख्या खेळाडूंच्या टीमसोबत भारत कसोटी मैदानात उतरणार आहे. नव्या जबाबदाऱ्या आणि नव्या आव्हानांसह टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पहिल्या टीम मिटिंगमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि इमोशनल भाषणही दिले. 

काय म्हणाला गौतम गंभीर?

गौतम गंभीर यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला म्हणाला की टीम आता पहिल्यांदा आपल्या तीन सर्वात अनुभवी खेळाडूशिवाय मैदानात उतरणार आहे. पण संघाने याकडे आव्हान न मानता संधी म्हणून पाहावं असे तो म्हणाला आहे. “देशासाठी खेळणं हीच खरी प्रेरणा आहे,” असं म्हणत गंभीर यांनी नव्या पिढीच्या खेळाडूंमध्ये भरपूर जोश भरला. “ इंग्लंडसारख्या मजबूत संघाविरुद्ध खेळताना प्रत्येक सत्र, प्रत्येक चेंडू, प्रत्येक क्षण लढवावा लागेल, तेव्हाच इतिहास घडवता येईल. ” असंही त्याने स्पष्टपणे सांगितलं. गौतम गंभीर म्हणाला, " या दौऱ्याकडे पाहण्याचे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे आपल्याकडे आपल्या तीन सर्वात अनुभवी खेळाडूंशिवाय आहोत किंवा आपल्याला देशासाठी काहीतरी करण्याची ही उत्तम संधी मिळाली आहे."  काही चाहत्यांचा असा विश्वास आहे की गंभीरचे वक्तव्य, रोहित आणि कोहली आणि अश्विनच्या योगदानाचा आदर करण्यासोबतच, संघ आता एका नवीन युगात प्रवेश करत असल्याचा संदेश देखील देते.

हे ही वाचा: Finn Allen: फिन अ‍ॅलेनचा ऐतिहासिक पराक्रम! 49 चेंडूत 150 धावा, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला

 

नव्या चेहऱ्यांचं जोरदार स्वागत, गिल-पंतच्या खांद्यावर नेतृत्व

शुभमन गिलला कर्णधारपद मिळालं असून, ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून टीमच्या नेतृत्व गटात सामील झाला आहे. यावरही गंभीर यांनी दोघांचे अभिनंदन केलं आणि नव्या युगाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. या मालिकेसाठी टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. गंभीर यांनी या सर्व नवोदितांचं मनापासून स्वागत केलं. सर्वप्रथम साई सुदर्शनच्या नावाने टाळ्यांचा कडकडाट झाला. “टेस्ट टीममध्ये निवड होणं हा प्रत्येक खेळाडूसाठी खास क्षण असतो. गेल्या काही महिन्यांतील साईचा फॉर्म कमालीचा होता.” असं म्हणत गौतमने साई सुदर्शनच कौतुक केलं. यानंतर त्याने अर्शदीप सिंहचंही कौतुक केलं. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शनानंतर त्याला कसोटीत संधी मिळाली असून, गंभीरचा असा विश्वास आहे की अर्शदीप लाल चेंडूतही तितकाच प्रभाव टाकेल.

हे ही वाचा: मुलगी पाहिली की त्याची विकेट जाते... 500 हून अधिक महिलांसोबत संबंध... स्वतःच केला विचित्र खुलासा

 

करुण नायरचे पुनरागमन

करुण नायरचे पुनरागमन फारच विशेष ठरले आहे. करुणबद्दल गंभीर म्हणाला, “7 वर्षांनंतर पुनरागमन करणं सोपं नसतं. पण नायरने हार न मानता जबरदस्त  पुनरागमन केलं आहे.  त्याचा संयम आणि जिद्द संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी आहे.”

 

 

हे ही वाचा: टीम इंडियाच्या सराव सत्रातच मोठा झटका! इंग्लंडमध्ये पहिल्याच दिवशी सरावादरम्यान 'हा' स्टार खेळाडू जखमी

 

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया

कर्णधार: शुभमन गिल
उपकर्णधार आणि यष्टीरक्षक: ऋषभ पंत
अन्य खेळाडू: यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव

Read More