World Cup 2023 Final India Loss Babar Azam Reacts: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने यजमान भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केलं. भारताचा हा पराभव 140 कोटी भारतीयांच्या जिव्हारी लागला असून मैदानामध्ये कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबरोबर के. एल. राहुल आणि इतर खेळाडूंनाही अश्रू अनावर झाल्याचं चित्र रविवारी सायंकाळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळालं. भारताने या स्पर्धेत सर्वच्या सर्व 10 सामने जिंकले होते. मात्र अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं ते ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने केलेल्या शतकामुळे. भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर लगेच पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने इन्टाग्राम स्टोरीवरुन पहिली प्रतिक्रिया दिली. बाबर हा या सामन्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या पहिल्या काही मोजक्या क्रिकेटपटूंपैकी एक ठरला.
अंतिम सामन्याच्या दिवशी बाबर आझम गोल्फचा आनंद घेत होता. त्याने यासंदर्भातील फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केले.
अंतिम सामन्यामध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर बाबर आझमने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ऑस्ट्रेलियन संघाचं अभिनंदन केलं. बाबर आझमने ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी ही कौतुकास्पद असल्याचं म्हटलं. "ऑस्ट्रेलियन संघाचं अभिनंदन! अंतिम सामन्यामध्ये फारच कौतुकास्पद कामगिरी केली," असं बाबरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या काही चाहत्यांनी बाबरच्या या स्टोरीचा संबंध इंग्लंडने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर विराट कोहलीने पोस्ट केलेल्या जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीशी लावला आहे. अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी बाबरने वर्ल्ड कप 2023 नंतर पोस्ट केलेल्या इन्टाग्राम स्टोरीची तुलना विराटच्या त्या स्टोरीशी करत याला कर्म म्हणतात असा खोचक टोला भारताच्या पराभवावर लगावला आहे.
1)
Babar Proving LHS= RHS and Newton's 3rd law at the same time.
— Muhammad Sadiq (@Khan7567) November 19, 2023
It's called karma#IrfanPathan pic.twitter.com/Wyw3OQSsvA
2)
Karma is real bitch
— forever captain Babar (@HaniKha73930485) November 19, 2023
Babar laughed.....pic.twitter.com/GMNRh1UBg8
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सुमार कामगिरी केली. पाकिस्तानी संघ साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला. पाकिस्तानी संघ पाचव्या स्थानी राहिला. या स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर बाबरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य वाटलं. भारताने नेहमीप्रमाणे या सामन्यालाही दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने त्याच्या आक्रमक शैलीमध्ये फटकेबाजी केली. मात्र शुभमन गिल स्वस्तात परतल्यानंतर रोहित शर्माही अर्धशतकापासून 3 धावा दूर राहिला. रोहित शर्मा ग्लेन मॅक्सवेलला षटकार मारण्याच्या नादात 47 वर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अहमदाबदच्या वापरलेल्या खेळपट्टीचा पूर्ण वापर केला. विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनाही अर्धशथकं झळकावली. मात्र त्यांनी फारच संथ खेळ केल्याची टीका सोशल मीडियावरुन होताना दिसतेय. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. तळाचे फलंदाज कुलदीप यादव आणि सिराज यांनी तळाशी फलंदाजी करताना काही फटकेबाजी केल्याने भारताचा स्कोअर 240 पर्यंत पोहोचला.
भारतीय गोलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. 47 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 3 गडी तंबूत परतले होते. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबूशेनने 192 धावांची पार्टनरशीप केली. हेडने शतक झळकावत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा 7 वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.