India vs England: भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या ज्यामुळे वादही निर्माण झाला आहे. अखेरच्या 15 ओव्हर्स शिल्लक असताना इंग्लड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने सामना जाहीर कऱण्यासाठी भारतीय फलंदाजांना आवाहन केलं. पण त्यावेळी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आपल्या शतकांच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे भारताने ही मागणी फेटाळून लावली. दोघांनी शतकं ठोकल्यानंतर अखेर सामना संपवण्यात आला. इंग्लंडला अखेरच्या 15 ओव्हर्स टाकण्याची इच्छा नव्हती, यामुळेच जेव्हा दोघांनी शतकं ठोकली तेव्हा इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याची नोंद घेतली नाही.
इंग्लंडच्या गोलंदाजांचं वागणं गावसकरांना पटलं नाही आणि त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. "इंग्लंडच्या बहुतेक खेळाडूंनी शतकं पूर्ण झाल्यावर टाळ्या वाजवल्या नाहीत हे खरोखर चांगलं प्रतिबिंबित करत नाही, कारण त्यांना दोघांनीही 80 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत हे मान्य करावे लागले असते. मला माहिती आहे की मॉडर्न क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना पुरेसा पुरुषार्थ नसणे किंवा दुसऱ्या खेळाडूची श्रेष्ठता मान्य करण्याइतकी परिपक्वता नसणं म्हणून कमी लेखले जाते. जर बेन स्टोक्स किंवा जो रूट याबद्दल थोडेसे व्यंग्यात्मक असतील तर मी हे समजू शकतो. पण या इंग्लंड संघातील इतर कोणीही इतकी शतकं छळकावलेली नाहीत की शतकं करु पाहणाऱ्या खेळाडूंना व्यंगात्मकपणे पाहू शकतील," असं गावस्कर सोनी स्पोर्ट्सवर म्हणाले.
रविवारी चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी जडेजा आणि सुंदर यांनी इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सचा सामना घोषित करून अनिर्णित राहण्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटच्या तासाच्या खेळापूर्वी जडेजा आणि सुंदर यांनी इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सचा चौथा कसोटी सामना घोषित करण्याचा आणि अनिर्णित राहण्याचा प्रस्ताव नाकारला. निकालाची शक्यता अशक्य वाटत असल्यास दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन करून अनिर्णित राहण्याची परवानगी देण्याची तरतूद आहे.
सामना अनिर्णित राहण्यासाठी इतके प्रयत्न केल्यानंतर, जडेजा आणि वॉशिंग्टन यांनी स्टोक्सचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला, ज्यामुळे इंग्लंडचा कर्णधार नाराज झाला. जडेजा आणि वॉशिंग्टन दोघेही आपल्या शतकाच्या जवळ असल्याने फलंदाजी सुरू ठेवण्याचा अधिकार वापरला. भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी फलंदाजी सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
"भारत ज्या परिस्थितीत होता, आम्ही खेळाची सुरुवात जशी केली होती, ते पाहता भागीदारी खूप मोठी होती. तुमच्याकडे सामन्यात वर्चस्व होतं. ते अविश्वसनीय आणि जबरदस्त चांगले खेळले. मला वाटत नाही की नाबाद शतक ठोकून तुमच्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात, 80, 90 धावांवर नाबाद राहण्यापेक्षा जास्त समाधान मिळालं असतं. तुम्ही तुमच्या संघासाठी तेच केलं आहे. आणखी 10 धावा किंवा जे काही होते ते तुम्ही तुमच्या संघाला खूप कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाला आहात आणि शेवटच्या सामन्यापूर्वी तुमच्या संघाला मालिका पराभवापासून जवळजवळ वाचवले आहे हे तथ्य बदलणार नाही," असं बेन स्टोक्सने सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.