Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'गिलला कॅप्टन केल्यानंतर म्हणू नका की...', सिद्धूची गौतमला 'गंभीर' वॉर्निंग; म्हणाला, 'मी पूर्णपणे...'

India vs England Test Series 2025: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल इथपासून चौथ्या स्थानावर कोण खेळणार या साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळण्याच्या काही तास आधीच ही प्रतिक्रिया समोर आली

'गिलला कॅप्टन केल्यानंतर म्हणू नका की...', सिद्धूची गौतमला 'गंभीर' वॉर्निंग; म्हणाला, 'मी पूर्णपणे...'

India vs England Test Series 2025: जून महिन्यामध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांसाठी जाणारा भारतीय कसोटी संघाची शनिवारी सायंकाळी घोषणा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज नवज्योत सिंग सिद्धू यांनी जसप्रीत बुमराहला भारताचा पुढील कसोटी कर्णधार केलं पाहिजे असं म्हटलं आहे. बुमराह हा कर्णधार म्हणून आदर्श उमेदवार आहे. इंग्लंड मालिकेसाठी संघ जाहीर करण्यापूर्वी सिद्धू यांनी, "परदेशात त्याच्या चमकदार कामगिरीमुळे बुमराह कर्णधार म्हणून योग्य पर्याय असेल," असं मत व्यक्त केलं आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, निवडकर्त्यांसमोर नवीन कर्णधार निवडण्याचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराह उपकर्णधार होता आणि दोन सामन्यांमध्ये त्याने संघाचे नेतृत्वही केले होते. दुसरीकडे शुभमन गिल हा कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत आहे.

पंड्याचं उदाहरण देत सिद्धूने मांडला मुद्दा

"कठीण परिस्थितीत खेळायचं आहे, बरोबर ना? अशावेळी उत्तम कर्णधाराशिवाय, मजबूत नेत्याशिवाय शिखर सर करणे अशक्य आहे. अशी कोणती व्यक्ती आहे जी म्हणेल की, मी कर्णधारपदाच्या रांगेत उभा आहे? मी उत्तम उदाहरण ठरेल असं नेतृत्व करेन म्हणण्याची हिंमत कोण दाखवले? कोणती अशी व्यक्ती आहे जी त्याचं ऐकणाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करु शकेन? कोणती अशी व्यक्ती आहे जी सर्वांची मान्यता मिळवेल? गेल्या पर्वामध्ये हार्दिक पंड्या मुंबईच्या संघात दाखल झाला होता. त्याला मान्यता मिळाली नव्हती. संघाचे काय झाले? यावेळी, पंड्याला लोकमान्यता आहे," असं सिद्धूने आपलं म्हणणं मांडताना स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

बुमराह योग्य असं का म्हणाला?

"मुंबईच्या संघाकडे आता पाहा, संघ कसा एकत्र खेळतोय. त्यामुळेच आता भारतीय संघ कोणावर विश्वास ठेवेल की हो, हाच तो माणूस आहे जो आपले नेतृत्व करू शकतो? मला वाटतं तो बुमराह आहे. मी त्याच्याबद्दल असं का बोलतोय? कारण त्याची सर्वोत्तम कामगिरी परदेशातच झाली आहे. आता मी अशा अनेक गोष्टी ऐकतो ज्यात त्याला दुखापत होऊ नये असं म्हटलं जातं. आयुष्यात सर्वात जास्त ओझे अशा गोष्टींचे असते ज्या घडू शकतात पण घडत नाहीत," असं सूचक विधान सिद्धूने पुढे आपलं मत मांडताना केलं. 

गिलचं फलंदाज म्हणून कौतुक

सिद्धूने फलंदाज म्हणून गिलचे कौतुक केले. गिलने सलामीवीर म्हणून फलंदाजीला यावं किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळावे. केएल राहुलने विराट कोहलीची चौथ्या क्रमांकाची जागा घ्यावी आणि तिथे फलंदाजी करावी, असंही सिद्धूने सुचवलं आहे. "मी पूर्णपणे गिलच्या बाजूने आहे. पण फलंदाज गिलच्या बाजूने! जर तुम्ही त्याला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनवले तर त्याला ओपनिंग करायला सांगा किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळवा. मग त्याला बचावात्मक खेळायला लावू नका. मग तुम्हाला तो आपला कर्णधार असल्याचं वेळोवेळी सूचित करुन अधोरेखित करावं लागेल," असं सिद्धू म्हणाला.

गौतमला गंभीर सल्ला

सिद्धू यांनी प्रशिक्षक गौतम गंभीरला सल्ला देताना गिलला कर्णधार केल्यानंतर त्याला त्याच्या कामगिरीमधून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी त्या असं सूचित केलं आहे. गौतम गंभीरने गिलला कर्णधार केल्यानंतर त्याचा बचाव करण्याची गरज नसल्याचं सिद्धूने म्हटलं आहे. "आपण त्याच्यावर एका वर्षभरासाठी गुंतवणूक करत आहोत. गिल ओपनिंग करतो हे लक्षात ठेवा. त्याला कर्णधार केल्यानंतर असे म्हणू नका की आम्ही कोहलीऐवजी त्याला खेळवू. तुम्ही असं करू शकत नाही. कारण ते चुकीचं ठरेल. एका बलवान माणसाला संरक्षणाची गरज नसते. तुम्ही सरफराजला तिथे खेळवा ना. मागच्या वेळी तुम्ही सरफराजला संघात घेतले होते. मी श्रेयस अय्यरला खेळवीन. तुम्हाला श्रेयस अय्यरला त्या क्रमांकावर ठेवायचे नाही. करुण नायरला आणा. माझा उद्देश हा केवळ केएल राहुलला क्रमांक चौथ्या क्रमांकावर वर खेळवण्याचे आहे," असं तो पुढे म्हणाला.

Read More