Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'जर MI हारली असती तर पांड्याला...', रोहित शर्माला विजयाचं श्रेय देणाऱ्यांवर भारतीय क्रिकेटर संतापला, 'बाहेर बसून...'

IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सविरोधातील (Delhi Capitals) सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कर्ण शर्माला मैदानात आणण्याच्या निर्णयाने सामन्याचं चित्र पालटल्याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) कौतुक केलं जात आहे. पण काहा माजी भारतीय क्रिकेटर्सनी यावर असहमती दर्शवली आहे.    

'जर MI हारली असती तर पांड्याला...', रोहित शर्माला विजयाचं श्रेय देणाऱ्यांवर भारतीय क्रिकेटर संतापला, 'बाहेर बसून...'

IPL 2025: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अखेर दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पराभूत करत आयपीएल 2025 मध्ये आणखी एका विजयाची नोंद केली आहे. मुंबईने दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. या सामन्यात कर्ण शर्माने (Karn Sharma) मोलाची भूमिका बजावली. मधल्या ओव्हर्समध्ये कर्ण शर्माने तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तसंच रन आऊटच्या हॅट्ट्रीकने दिल्ली संघाला सामन्यातून बाहेर फेकलं. कर्ण शर्माने घेतलेल्या तीन विकेटकडे टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जात असलं, तरी याचं सर्व श्रेय रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं जात आहे. रोहित शर्मानेच कर्ण शर्माला नवीन चेंडूसह खेळण्यास सांगितल्याने त्याला यामागील मास्टरमाइंड म्हटलं जात आहे. मात्र माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर आणि संजय बांगर यांनी यावर नाराजी जाहीर केली आहे. 

ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सनेही कर्ण शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणण्याची सूचना केल्याबद्दल  रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. दुसऱ्या डावात रोहित शर्माऐवडी कर्णला संधी देण्यात आली. रोहितने एमआयचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्याशी या बदलाची चर्चा केली आणि नंतर मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेनेही कर्णधार हार्दिकला हा बदल करण्यास सांगितलं. 

IPL 2025: "त्याला काही अर्थ नाही...", MI ने पराभव केल्यानंतर करुण नायरच्या विधानाने भुवया उंचावल्या, 'जर संघाला...'

 

मुंबईने अटीतटीचा सामना जिंकल्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडे रोहित शर्माच्या रणनितीचं कौतुक केलं जात आहे. समालोचक संजय बांगर आणि संजय मांजरेकर यांनी नाराजी जाहीर केली आहे. 

संजय बांगर: विजयाचं सर्व श्रेय रोहित शर्माला देण्यात आलं. पण ते कर्ण शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना द्यायला हवं होतं. कर्णने योजनेची अंमलबजावणी केली, पण हार्दिकने सूचना दिल्या."

संजय मांजरेकर: सूचना देण्यासाठी बरेच लोक आहेत पण ते सर्व निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याने (हार्दिकने) रोहितचा सल्ला ऐकला ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही इथेही रोहितला श्रेय दिलं असतं आणि हार्दिक पंड्याला नाही, तर ते चुकीचे ठरेल. जर सूचना अयशस्वी झाली असती, तर तुम्ही हार्दिकला दोष दिला असता. बाहेरून सूचना देणे खूप सोपे आहे. याचे (विजयाचे) संपूर्ण श्रेय हार्दिक पंड्याला द्यायला हवे. तो (मुंबईच्या अलीकडील निकालांवर) किती भावनिक झाला आहे हे लक्षात घेता, तो त्याच्यासाठी एक महत्त्वाचा विजय होता. त्याच्यासाठी हा प्रवास खूपच कठीण होता. सोशल मीडिया आणि इतर लोक असे म्हणत असतील की रोहित शर्माच्या सूचनांमुळे मुंबई इंडियन्स जिंकली. हार्दिक पंड्या कर्णधार आहे आणि तोच निर्णय घेतो, मग तो सूचना कोणी देत ​​असला तरी."

दिल्लीविरोधातील सामन्यातही रोहित शर्मा फार योगदान देऊ शकला नाही. मात्र मुंबई इंडियन्ससाठी तो बेंचवर बसून सक्रिय रणनीतीकार म्हणून भूमिका निभावत असल्याचं दिसत होता. स्ट्रॅटेजिक टाइमआउट दरम्यानही, रोहित एमआय प्रशिक्षक जयवर्धनेसोबत मैदानावर दिसत होता आणि आपलं मत मांडत होता. 

Read More