Can Mumbai Indians still qualify for Playoffs: इंडियन प्रिमिअर लीगची (IPL 2025) स्पर्धा पाच वेळा जिंकणारे दोन संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज! मात्र 2025 च्या पर्वात हे दोन्ही संघांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे. पाच सामन्यानंतर मुंबईच्या संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबईचा संघ मागील पर्वात पॉइण्ट्स टेबलमध्ये (IPL 2025 Points Table) ताळाशी राहिला होता. तशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. केवळ दोन पॉइण्ट्ससहीत मुंबई सध्या पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी असलेल्या चार संघांमध्ये आहे. अजूनही मुंबईचे अनेक सामने बाकी असले तरी चाहत्यांना, "मुंबई प्ले ऑफ्ससाठी क्वॉलिफाय होईल का?" असा प्रश्न पडला आहे. मुंबईची सध्याची परिस्थिती पाहता खरोखरच ते 14 सामन्यानंतर पात्र ठरु शकतात की नाही हे पाहूयात...
मुंबईच्या संघासमोर कामगिरीबरोबरच दुखापती आणि कामगिरीत सातत्य राखण्यात अभाव अशा दोन मुख्य अडचणी दिसत आहेत. अजून बराच मोठा पल्ला शिल्लक असला तरी सध्या मुंबईच्या संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचं दिसत आहे. काही अगदी अटीतटीचे सामने मुंबई गमावले. असं असलं तरी मुंबईचा संघ कमबॅकसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच काही लागोपाठ विजय मिळल्यास मुंबईचा संघ पुन्हा दमदार पुनरागमन करु शकतो याबद्दल आयपीएलचा इतिहास ठाऊक असलेल्या कोणालाही काहीही शंका नाही.
अर्थात सध्या तरी मुंबईची पुढील वाटचाल थोडी खडतर दिसत आहे. मुंबई प्ले ऑफ खेळणार की नाही हे पुढील सामन्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे खेळाडू कसे खेळतात यावर अवलंबून आहे. तसेच मुंबईला काही महत्त्वाचे सामनेही जिंकावे लागणार आहेत.
मुंबईचा संघ मागील बऱ्याच काळापासून पॉइण्ट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. मुंबईच्या संघाचं नेट रन रेटही उणे आहे. 10 तारखेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, स्पर्धेतील 23 सामन्यानंतर पाच पैकी चार सामने गमावून मुंबईचा संघ आठव्या स्थानी आहे. कोणत्याही संघाला प्ले ऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर किमान आठ विजय आवश्यक आहेत. किमान विजयानंतर महत्त्वाचा ठरतो तो नेट रनरेटचा आकडा. मुंबईचा सध्याचा म्हणजेच 10 एप्रिलचा नेट रन रेट हा उणे 0.010 इतका आहे.
10 एप्रिलचा सामना होण्याआधीची स्थिती
मुंबईला आता सातत्यपूर्ण विजय आवश्यक आहेत. त्यांना पुढील काही सामन्यामध्ये दिल्ली, गुजरात, पंजाबसारख्या तगड्या संघांचा सामना करायचा आहे. या सामन्यामध्ये त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं आहे. कारण असं झालं तर किमान सहा सामने जिंकणारे पात्र ठरतील अशा स्थितीत त्यांना नेट रन रेटच्या जोरावर पात्र ठरता येईल.
मुंबईच्या विजयामध्ये उत्तम योगदान देऊ शकतात किंवा मुंबई पात्र ठरणार की नाही हे ज्या खेळाडूंवर अवलंबून आहे त्यांची नावं खालीलाप्रमाणे :
जसप्रित बुमराह
सुर्यकुमार यादव
हार्दिक पांड्या
ट्रेण्ट बोल्ट
रोहित शर्मा
पात्र ठरणार की नाही हे खालील पाच गोष्टींवर अवलंबून आहे
बुमराह कशी कामगिरी करतो?
फिरकी गोलंदाज किती यशस्वी ठरतात?
हार्दिक पांड्या फलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतो?
परदेशी फलंदाज संथ खेळपट्टीवर कशी कामगिरी करतील?
मुंबईला प्ले ऑफमध्ये पात्र होण्यासाठी किमान 16 गुणांची म्हणजे आठ विजयांची आवश्यकता आहे. म्हणजेच आता मुंबईला उर्वरित 9 सामन्यांपैकी 7 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. अर्थात इतर संघांची कामगिरी आणि नेट रन रेटचा विचार करता अगदी 14 पॉइण्ट्स म्हणजे एकूण 7 विजयांसहीतही मुंबईचा संघ क्वालिफाय करु शकतो. मात्र हे सारं जर-तरवर अवलंबून आहे. मुंबईने सध्या तरी किमान 7 सामने जिंकून 16 गुणांची अट पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. मुंबईच्या संघाने मरगळ झटकून सामन्यांमध्ये सातत्याने विजय मिळवणं आवश्यक आहे.