Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025: 'लोक विसरत चालले आहेत की...', RCB गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर गेल्यानंतर विराट स्पष्टच बोलला, 'मला संधी..'

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या फलंदाजीच्या पद्धतीबद्दल खुलासा करताना म्हटलं आहे की, त्याचं सगळं लक्ष परिस्थितीचं विश्लेषण करणं आणि स्ट्राइक फिरवणं यावर असतं.  

IPL 2025: 'लोक विसरत चालले आहेत की...', RCB गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर गेल्यानंतर विराट स्पष्टच बोलला, 'मला संधी..'

दिल्लीचा पराभव करत बंगळुरुने गुणतालिकेत अव्वल क्रमांक गाठला आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा धावांचा यशस्वी पाठलाग करत संघाच्या नावावर आणखी एका विजयाची नोंद केली आहे. विजयानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या फलंदाजीच्या पद्धतीबद्दल खुलासा करताना म्हटलं की, त्याचं सगळं लक्ष परिस्थितीचं विश्लेषण करणं आणि स्ट्राइक फिरवणं यावर असतं. 163 धावांचा पाठलाग करताना बंगळुरुची स्थिती 26 धावांवर 3 गडी बाद होती. नंतर विराट कोहली (51) आणि कृणाल पांड्या (नाबाद 73) यांनी 84 धावात 119 धावांची भागीदारी केली. बंगळरुने 18.3 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकला. 

"खासकरुन खेळपट्टी पाहता हा एक उत्तम विजय होता. आम्ही येथे काही सामने पाहिले आणि हा सामना त्या तुलनेच वेगळा होता. जेव्हा जेव्हा पाठलाग सुरू असतो तेव्हा मी डगआउटवरून तपासत राहतो की आम्ही मार्गावर आहोत की नाही," असं ऑरेंज कॅप घातलेला कोहली विजयानंतर म्हणाला.

"मी खेळताना सतत एक किंवा दोन धावा काढण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरुन खेळ थांबू नये. लोक भागीदारीचे महत्त्व विसरत आहेत आणि या स्पर्धेत भागीदारी आणि व्यावसायिकतेद्वारे गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असंही त्याने सांगितलं. 2016 नंतर कृणालचं हे पहिले अर्धशतक होतं.

"कृणाल मैदानात उत्कृष्ट होता, तो प्रभाव पाडू शकतो. ही फक्त वेळेची गोष्ट आहे. आम्ही सुंदरपणे संवाद साधला. कृणाल मला तो संधींचा फायदा उचलत असताना मला थांबण्यास सांगत होता," अशी माहिती कोहलीने दिली. विराट कोहली बाद झाल्यानंतर टीम डेव्हिड मैदानात आला होता. त्याने 5 चेंडूत 19 धावा ठोकल्या.

फिनिशरबद्दल बोलताना कोहली म्हणाला, "टीम डेव्हिडमध्ये अतिरिक्त ताकद आहे, जितेश देखील आहे. डावाच्या शेवटी असलेली ती ताकद तुम्हाला नक्कीच मदत करते. आणि आता रोमारियो देखील आहे". गोलंदाजांचे कौतुक करताना, आरसीबीचा माजी कर्णधार म्हणाला,  "हेझलवूड आणि भुवी हे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत, जोशला पर्पल कॅप मिळण्याचे एक कारण आहे. कृणालने त्याच्या वेगात विविधता आणली आणि त्यात तो उत्कृष्ट होता. सुयशकडे विकेट नसल्या तरी तो आमच्यासाठी डार्क हॉर्स आहे. आमचे फिरकी गोलंदाज मधल्या षटकांमध्ये आक्रमक खेळी करत राहतात".

दरम्यान दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने आम्हाला 10 ते 15 धावा कमी पडल्याचं म्हटलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की त्यांच्या संघाकडे स्पर्धात्मक धावसंख्येपेक्षा 10 ते 15 धावा कमी होत्या. "मला वाटतं की आम्ही 10-15 धावांनी कमी होतो. मला वाटतं की पहिल्या डावात विकेट थोडी कठीण होती पण दव पडल्यामुळे दुसऱ्या डावात ती कमी झाली,"असं  तो म्हणाला.

"केएल चांगली फलंदाजी करत होता म्हणून मला तो क्रमांक ४ वर हवा होता. मैदानाची एक बाजूही लहान होती म्हणून आम्ही त्याला क्रमांक ४ वर पाठवले." त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आलेले कृणाल, ज्याने ७३ नाबाद धावांसह एक विकेट घेतली, तो म्हणाला की तो संघात त्याच्या नेमलेल्या भूमिकेत कामगिरी करण्यास आनंदी आहे.

Read More