Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताची बॅटिंग गडगडली, कोहलीचा संघर्ष सुरू

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची बॅटिंग गडगडली आहे. 

भारताची बॅटिंग गडगडली, कोहलीचा संघर्ष सुरू

बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची बॅटिंग गडगडली आहे. दुसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताचा स्कोअर १६०/६ असा झाला आहे. विराट कोहली ५३ रनवर नाबाद आणि अश्विन ६ रनवर नाबाद खेळत आहे. इंग्लंडच्या सॅम कुरननं ४ तर बेन स्टोक्सनं २ विकेट घेतल्या आहेत. भारत अजूनही १२७ रननी पिछाडीवर आहे. लंचनंतर ७६/३ अशी सुरूवात करणाऱ्या भारतानं अजिंक्य रहाणे(१५), दिनेश कार्तिक(०) आणि हार्दिक पांड्या(२२) या तीन विकेट गमावल्या. पहिल्या सत्रामध्ये भारताला मुरली विजय(२०), शिखर धवन(२६) आणि लोकेश राहुल(४)च्या रुपामध्ये ३ धक्के बसले. मुरली विजय आणि शिखर धवननं ५० रनची ओपनिंग पार्टनरशीप केली होती.

त्याआधी दुसऱ्या दिवसाची सुरुवात २८५/९ अशी करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या दिवशी फक्त २ रनच करता आल्या. मोहम्मद शमीनं इंग्लंडची शेवटची विकेट घेतली. भारताकडून अश्विनला सर्वाधिक ४ विकेट मिळाल्या. तर मोहम्मद शमीला ३ विकेट घेण्यात यश आलं. उमेश यादव आणि इशांत शर्माला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ८० रन केल्या. रूटला विराट कोहलीनं रन आऊट केलं. तर जॉनी बेअरस्टोला ७० रनवर उमेश यादवनं बोल्ड केलं.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

Read More