Lucknow Super Giants vs Mumbai Indians: आयपीएल 2025 च्या एका दमदार सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव करून महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. पराभवानंतर मुंबई इंडियन्स (MI) कर्णधार हार्दिक पंड्याने शुक्रवारी सांगितले की त्याच्या संघाने गोलंदाजी करताना 10-12 धावा जास्त खर्च केल्या. तो म्हणाला "पराजय नेहमीच निराशाजनक असतो. जर मी प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्ही मैदानात 10-12 धावा जास्त खर्च केल्या. शेवटी आम्ही याच फरकाने हरलो." या सामन्यात हार्दिक पांड्याने टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेतल्या. याशिवाय सूर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक झळकावले. पण तरीही पराभवच पदरी आला. सामना संपल्यावर बोलताना मुंबई इंडियनच्याच्या पराभवाची जबाबदारी हार्दिकने कोणावर दिली बघुयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स या सामन्यात हार्दिकने स्वत:गोलंदाजी केली. त्यात त्याने 36 धावांत 5 विकेट घेतल्या. यावर तो म्हणाला, “मी नेहमीच माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतला आहे. माझ्याकडे जास्त पर्याय नाही, पण मी विकेट वाचतो आणि योग्य चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. मी विकेट्ससाठी जात नाही, पण फलंदाजांकडून चुका घडवण्याचा प्रयत्न करतो. आजही तेच घडले."
in Lucknow.#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #LSGvMI pic.twitter.com/LYJWazb6cj
— Mumbai Indians (@mipaltan) April 4, 2025
हार्दिकने फलंदाजीबाबत निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, “आम्ही बॅटिंग युनिट म्हणून कमकुवत होतो. आम्ही एक संघ म्हणून जिंकतो आणि एक संघ म्हणून हरतो. त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो." या सामन्यादरम्यान तिलक वर्माला धावबाद करण्याच्या निर्णयावरही चर्चा झाली. यावर हार्दिक म्हणाला, "आम्हाला काही मोठे शॉट्स हवे होते, पण तो ते करू शकला नाही. क्रिकेटमध्ये असे काही दिवस असतात, जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण गोष्टी घडत नाहीत."
विजयासाठी 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावाच करू शकला. शार्दुल ठाकूरने (४० धावांत एक विकेट) १९व्या षटकात अवघ्या सात धावा देत गोलंदाजी केली, त्यानंतर आवेश खानने (४० धावांत एक विकेट) अखेरच्या षटकात हार्दिकविरुद्ध २२ धावा देत शानदार बचाव केला. सामन्याच्या 19 व्या षटकात मुंबई संघाने टिळक वर्माला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा कोणताही फायदा संघाला झाला नाही. टिळकने 23 चेंडूत 25 धावा केल्या.