Good News For Team India Before Fifth Day: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng Test) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात आता निर्णायक पाचवा दिवस उरलेला आहे. आज, 24 जून रोजी पाचवा दिवस असून आजचाच निर्णायक दिवस ठरणार आहे. सध्या सामन्याची स्थिती रोचक वळणावर असताना, भारतीय संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हा सामना भारतासाठी जिंकण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. एका गोष्टीमुळे भारतीय संघाला खूप फायदा होईल असे सांगण्यात येत आहे. काय आहे ती गोष्ट चला जाणून घेऊयात...
पाचव्या दिवशी सकाळी लंडनमध्ये ढगाळ वातावरण, हलकासा पाऊस आणि दुपारनंतर वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बीबीसीच्या अंदाजानुसार दिवसभर अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे खेळपट्टीवर गवत आणि ओलावा कायम राहण्याची शक्यता आहे. हे सर्व परिस्थिती भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरू शकते.
स्विंग मिळण्याची शक्यता आणि खेळपट्टीवर चेंडू थोडा जास्त उसळी घेऊ शकतो, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. अशा वातावरणात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांसारख्या गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
चौथ्या दिवशी भारताने शानदार कामगिरी केली. लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांनी झळकावलेल्या शतकांमुळे भारताने दुसऱ्या डावात 364 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडपुढे आता विजयासाठी 371 धावांचे मोठे लक्ष्य आहे. दिवसाखेर त्यांनी 21 धावा केल्या असून त्यांचे सर्व फलंदाज अजून शिल्लक आहेत. म्हणजेच इंग्लंडला अजून 350 धावांची गरज आहे, तर भारताला 10 विकेट्स हव्या आहेत.
भारताच्या फक्त पाच फलंदाजांनी मिळवल्या 721 धावा, उर्वरित सहा जण मिळून फक्त 65.
पहिल्या डावात भारताचे शेवटचे पाच फलंदाज 24 धावांत गडगडले.
दुसऱ्या डावातही सहा फलंदाज फक्त 31 धावांत बाद.
इंग्लंडच्या शेवटच्या पाच फलंदाजांनी पहिल्या डावात मिळवल्या तब्बल 189 धावा.
पाचव्या दिवशी हवामानाच्या मदतीने भारताला विजयाचा मार्ग सोपा होईल का, हे पाहणे उत्सुकतेचा ठरणार आहे. सर्वांचे लक्ष आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर केंद्रित असणार आहे.