Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

"मला यंदा मुंबई इंडियन्सला हरताना पाहायचं आहे"

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेल्या मुंबई इंडियन्सबाबत माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे. 

नवी दिल्ली : आयपीएलचा दुसरा टप्पा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. दिवसेंदिवस आयपीएलचे सामने अधिक रोमांचक होताना दिसतायत. प्लेऑफमध्ये प्लेऑफबाबत सस्पेन्स वाढतोय. दरम्यान, भारताचा माजी अनुभवी फलंदाज वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेल्या मुंबई इंडियन्सबाबत मोठं विधान केलं आहे. यावर्षी मुंबई आयपीएल जिंकू नये अशी त्याची इच्छा असल्याचं त्याने सांगितलंय.

मुंबई यंदा जिंकू नये

वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे की, त्याला मुंबई इंडियन्सच नाही तर इतर कोणत्याही आयपीएल संघाने यावेळी ट्रॉफी जिंकताना बघायचं आहे. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला की, यावेळी त्याला मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवायचं नाही. सेहवागला यावेळी आयपीएलचा नवा चॅम्पियन बघायचा आहे. तीन संघांची नावे देत त्यांनी दिल्ली, पंजाब आणि बंगळुरूला विजेते म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई का आयपीएल जिंकू शकते?

मुंबई इंडियन्सबद्दल सेहवाग म्हणाला, 'मुंबई आयपीएलमधील सर्वोत्तम संघ आहे आणि त्याला पलटवार कसा करायचा हे देखील माहित आहे, परंतु मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील, तरच तो त्यात स्थान मिळवू शकेल. मुंबईसाठी आगामी सर्व सामने इतकं सोपं होणार नाहीत.

मुंबई इंडियन्सचा इतिहास पाहता, जेव्हा जेव्हा हा संघ या परिस्थितीतून गेला आहे तिथे संघाला करो या मरो सामना खेळायचा आहे. सेहवाग म्हणाला की, माझा इतिहासावर विश्वास नाही, हे पुन्हा पुन्हा होणं इतकं सोपं नाही.

Read More