Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'कानशिलात मारायला हवी होती...' श्रेयस अय्यर सोबतच्या वादावर शशांक सिंहने सोडलं मौन, चूक कोणाची होती?

IPL 2025 : सामन्यानंतर श्रेयस  शशांक सिंहला ओरडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, यादरम्यान श्रेयसने काही अपशब्दांचा सुद्धा उपयोग केला. या व्हायरल व्हिडीओबाबत शशांक सिंहला विचारण्यात आलं तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर ऐकून सर्वच थक्क झाले. 

'कानशिलात मारायला हवी होती...' श्रेयस अय्यर सोबतच्या वादावर शशांक सिंहने सोडलं मौन, चूक कोणाची होती?

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला होता. मात्र या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) स्टार फलंदाज शशांक सिंहने (Shashank Singh) केलेल्या एका चुकीमुळे कर्णधार श्रेयस अय्यरने खूप सुनावलं होतं.सामन्यादरम्यान महत्वाच्यावेळी शशांक रन आऊट झाला होता, ज्यामुळे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खूप नाराज झाला. श्रेयसने अखेर तुफान फटकेबाजी करून पंजाब किंग्सला विजय मिळवून दिला आणि संघाला फायनलमध्ये पोहोचवले. सामन्यानंतर श्रेयस  शशांक सिंहला ओरडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, यादरम्यान श्रेयसने काही अपशब्दांचा सुद्धा उपयोग केला. या व्हायरल व्हिडीओबाबत शशांक सिंहला विचारण्यात आलं तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर ऐकून सर्वच थक्क झाले. 

शशांक सिंहने चूक मान्य केली : 

पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंहने सांगितले की फायनलमध्ये आरसीबी विरुद्ध पराभूत झाल्यावर त्याचे वडिल त्याच्याशी बोलले नाही. शशांकने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आयपीएल 2025 मध्ये क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात शशांक सिंहने मोठी चूक केली. तो फिल्डवरील निष्काळजीपणामुळे रनआउट झाला. त्याची विकेट पंजाबला महागात पडली असती परंतु श्रेयस अय्यरने तुफानी खेळी करून डाव सावरला. पण शशांक सिंहने निष्काळजीपणामुळे विकेट गमावल्यामुळे श्रेयस त्याच्यावर रागावला आणि सामना संपल्यावर त्याला खूप सुनावले. 

याबाबत जेव्हा शशांकला विचारण्यात आलं तेव्हा तेव्हा तो म्हणाला की, 'मला हे ऐकायचंच होतं, अय्यरने तर माझ्या कानशिलात लगवायला हवी होती. माझ्या वडिलांनी सुद्धा यामुळे माझ्याशी फायनलपर्यंत संवाद साधला नाही. मी खूप निष्काळजीपणा केला, जसं की मी समुद्र किनाऱ्यावर फिरतोय. ती वेळ खूप नाजूक होती, श्रेयसला माझ्याकडून हे अपेक्षित नव्हते, पण नंतर तो मला जेवायला घेऊन गेला होता'.

हेही वाचा : श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा नवा कर्णधार? आयपीएलनंतर समोर आली मोठी माहिती

 

जसं ऐकलं तसंच पाहिलं : 

शशांक सिंह हा आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने 153 च्या स्ट्राईक रेटने 341 धावा केल्या. त्याने श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाची सुद्धा स्तुती केली. तो म्हणाला की, श्रेयस अय्यरपेक्षा चांगला कर्णधार कोणी असू शकत नाही. शशांकने सांगितले की, 'मी दुसऱ्यांकडून त्याच्याबाबत जे काही ऐकलं होतं की, सगळं खरं होतं. त्याने आम्हाला खुलेपणाने खेळण्याचं स्वातंत्र दिलं आणि तो सगळ्यांना एकसमान मानतो. असं कोणीच म्हणणार नाही की श्रेयस अय्यरमध्ये एटीट्यूड आहे'.

Read More