Test Cricket : जून महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजसाठी शनिवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. भारताचा माजी टेस्ट कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यावर शुभमन गिलला भारताच्या टेस्ट संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शुभमन गिल भारतीय संघाकडून क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो. तसेच त्याने टेस्ट फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाज तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. शुभमन गिल टेस्ट कर्णधार झाल्यावर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शुभमन गिलने सोशल मीडियावर बीसीसीआयद्वारे शेअर करण्यात आलेल्या एका छोट्या क्लिपमध्ये म्हंटले की, 'एक युवा लहान मूल म्हणून, जेव्हा कोणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो तेव्हा भारताकडून खेळायचे त्याचे स्वप्न असते, केवळ भारतासाठी खेळणेच नव्हे तर खूप काळ भारतासाठी टेस्ट क्रीकेट खेळणे. ही संधी मिळविण्यात सक्षम असणे हा एक मोठा सन्मान आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे ही एक मोठी जबाबदारी आहे'. शुभमन गिलने भारतासाठी 32 टेस्ट सामन्यात 35.1 च्या सरासरीने 1,893 धावा केल्या. यात त्याने 5 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत शुभमनला कर्णधार का केलं याचं उत्तर दिलं. ते म्हणाले, 'तुम्ही एक किंवा दोन दौऱ्यासाठी कर्णधाराची निवड करत नाही. तुम्ही अशा गोष्टीमध्ये गुंतवणूक करता, जी आम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल. आम्ही आशा करतो की हा योग्य निर्णय असेल. तुम्ही मागील एक किंवा दोन वर्षांपासून प्रगती पाहतच असाल.
आगरकरने पुढे म्हणाले की , 'बहुदा शुभमनला काम करता करता शिकावे लागेल. पण आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही त्याची निवड केलीये'. चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना कबूल केले की रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्या टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीने संघात मोठी उणीव निर्माण झाली आहे.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार) (विकेटकिपर ), यशस्वी जयसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू अस्वर्णा, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल (विकेटकिपर ), वॉशिंग्टन सुंदर,शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव