Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Video: सामना जिंकल्यावर कर्णधार शुभमन गिल घेतोय 'या' व्यक्तीचा शोध, कोण हरवलं आहे? जाणून घ्या

Shubman Gill: बर्मिंगहॅममधून कोण बेपत्ता झाला? एजबेस्टनमध्ये टीम इंडिया जिंकताच शुभमन गिल कोणाला शोधत होता?  तो कुठे आहे? असं गिल कोणाबद्दल विचारताना दिसला? चला जाणून घेऊयात.    

Video: सामना जिंकल्यावर कर्णधार शुभमन गिल घेतोय 'या' व्यक्तीचा शोध, कोण हरवलं आहे? जाणून घ्या

Shubman Gill hunts for someone: टीम इंडियाने एजबेस्टनमध्ये इतिहास रचला आहे. त्यांनी ते साध्य केले आहे जे आतापर्यंत धोनी-विराट यांच्यावेळीही साध्य झाले नव्हते. भारतीय क्रिकेट संघाने एजबेस्टन मैदानावर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे या विजयाचं नेतृत्व केलं होतं  युवा खेळाडू कॅप्टन शुभमन गिलने.  शुभमन गिल एजबेस्टनमध्ये विजयाची चव चाखणारा पहिला भारतीयच नाही तर पहिला आशियाई कर्णधारही बनला आहे. पण सामना संपताच, जेव्हा संघ एकत्र सेलिब्रेट करत होता, तेव्हा गिल मात्र कुणालातरी शोधत होता. प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील त्यांनी स्पष्टपणे विचारलं,  "तो कुठे आहे?"

शुभमन गिलच्या आहे कोणाच्या शोधात? 

सामना संपल्यानंतर गिल ज्याला शोधत होते, तो त्यांचा संघातील खेळाडू, कोच, किंवा स्टाफ नव्हता. तुम्हाला जाणून आश्यर्च वाटेल की ती व्यक्ती होती एक पत्रकार! हो, गिलने पत्रकार परिषदेत त्याचं नाव न घेता, त्याला आपला ‘फेव्हरेट जर्नलिस्ट’ म्हणून संबोधलं आणि विचारलं  "तो इथे आहे का?" (Wheres My Favourite Journalist? Shubman Gill Press Conference) 

हे ही वाचा: जिथे धोनी- विराट फेल तिथे गिलने दाखवला गेम! त्या मैदानावर शुभमन गिलनं दिला इंग्लंडला झटका; रचला ऐतिहासिक विक्रम

 

का घेत होता पत्रकाराचा शोध? 

शुभमन गिल एका पत्रकाराचा शोध का घेत होता? काय कारण होतं यामागे? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना. तर, या पत्रकाराने एजबेस्ट टेस्ट सुरू होण्याआधी गिलला भारताच्या या मैदानावरील खराब रेकॉर्डबद्दल विचारलं होतं. त्यावर शुभमन गिलने आत्मविश्वासाने उत्तर दिलं होतं की, “आम्ही आकडे पाहून खेळत नाही, आमची टीम वेगळी आहे आणि आम्ही कुठेही जिंकू शकतो.”

हे ही वाचा: आणखी एक भारतीय पोहोचला ICCमध्ये! 'या' व्यक्तीची झाली CEO म्हणून नियुक्ती, जाणून घ्या कोण आहे हा मीडिया दिग्गज

 

जे सांगितलं होतं, ते करून दाखवलं!

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने एजबेस्टवर ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवला, जो केवळ इंग्लंडमध्येच नाही तर एकूणच परदेशातला भारताचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी भारत कधीच एजबेस्टवर टेस्ट सामना जिंकला नव्हता, पण गिलने इतिहास बदलला. त्यामुळे सामना संपल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती,  “तो पत्रकार कुठे आहे?” कारण  जे काही सांगितलं होतं, ते गिलच्या सेनेने  करून दाखवलं होतं.

 

हे ही वाचा: आकाश दीपने वाजवला इंग्लंड संघाचा बँड! पहिल्यांदाच घेतला पाच विकेट्स हॉल, टीमसोबत सेलिब्रेशनचा जल्लोष; पाहा VIDEO

ही मालिका लक्षात राहील अशीच करणार- गिल 

शुभमन गिलने पुढे म्हटलं, "जर सगळं ठीक चाललं, तर ही मालिका आम्ही अशी खेळू की ती प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या लक्षात राहील." खरच गिलची खेळी, नेतृत्वशैली आणि आत्मविश्वासाने भारतासाठी एक नवा इतिहास घडवला आहे.

Read More