Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

"तुम्ही जे काही पाहता त्यावर..." हार्दिक आणि गिलमध्ये All is not well? शुभमनने स्वतः केला खुलासा

IPL 2025 : सामन्याच्या आधी टॉसदरम्यान शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. एवढंच नाही तर टॉस झाल्यावर दोघांनी हातही मिळवला नाही. यावरून दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात होतं मात्र शुभमन गिलने आता याबाबत खुलासा केला आहे. 

IPL 2025 : आयपीएल 2025 (IPL 2025) चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात शुक्रवारी रंगला. मात्र या सामन्यात शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांच्यामध्ये क्रिकेटप्रेमींनी एक अनपेक्षित दृश्य पाहिलं. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सामन्याच्या आधी टॉसदरम्यान शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. एवढंच नाही तर टॉस झाल्यावर दोघांनी हातही मिळवला नाही. यावरून दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात होतं मात्र शुभमन गिलने आता याबाबत खुलासा केला आहे. 

नक्की काय घडलं होतं? 

शुक्रवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्याच्या आधी टॉसदरम्यान शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. एवढंच नाही तर टॉस झाल्यावर दोघांनी हातही मिळवला नाही. हार्दिक पांड्या टॉसचा निकाल लागल्यानंतर शुभमन गिलकडे वळला. त्याला बघून असं  वाटलं की तो, जणू हातमिळवणीसाठी पुढे येत आहे. पण गिल काहीसा गडबडला आणि त्याने हात पुढे केला नाही. त्यानंतर हार्दिक पंड्या थेट कमेंटेटर रवि शास्त्रीकडे गेला आणि त्यांच्याशी बोलायला लागला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

घडलेली घटना इतकी स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाली होती की सोशल मीडियावर लगेचच “गिल आणि पांड्या यांच्यात वाद?” अशा चर्चांना उधाण आलं. तसेच सामना सुरु झाल्यावर मुंबईकडून पहिली ओव्हर टाकत असलेल्या ट्रेंट बोल्टने शुभमन गिलला इन-स्विंगरवर थेट LBW करत गोल्डन डकवर बाद केलं. गिल बाद होताच हार्दिक पंड्या प्रचंड जोशात आला आणि त्यानं गिलसमोरच जोरदार सेलिब्रेशन केलं. अनेकांनी या सेलिब्रेशनला "सेंड-ऑफ" असं नाव दिलं. 

हेही वाचा : IPL 2025 Qualifier 2 : पावसामुळे मुंबई विरुद्ध पंजाब मॅच रद्द झाली तर कोणता संघ जाणार फायनलला? जाणून घ्या नियम

शुभमन गिलचा खुलासा : 

शुभमन गिल याला भारताचा टेस्ट कर्णधार झाल्यावर एक वेगळाच अटीट्युड आला असल्याचं काही नेटकऱ्यांकडून बोललं जातं होतं. मात्र एलिमिनेटर सामन्यातील हार्दिक सोबतचे व्हिडीओ चुकीच्या आशयाखाली व्हायरल होत असताना शुभमनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून खुलासा केला. यात शुभमनने हार्दिकसोबतचे काही फोटो शेअर केले. यावर त्याने लिहीत म्हटले की, 'प्रेमाशिवाय काहीही नाही... इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका'. यामाध्यमातून शुभमनने त्याच्या आणि हार्दिकमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं म्हटलं. 

Read More