Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टी -20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा हा खेळाडू जखमी, तर या मोठ्या क्रिकेटपटूला संधी मिळण्याची शक्यता

टी -20 वर्ल्ड कप भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

टी -20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा हा खेळाडू जखमी, तर या मोठ्या क्रिकेटपटूला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) यूएईमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टी -20 वर्ल्ड कप भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. याआधीही टी -20 वर्ल्ड कपमध्ये निवड झालेला लेगस्पिनर वरुण चक्रवर्ती त्याच्या दुखापतीमुळे बऱ्याच काळ चर्चेत राहिला. बीसीसीआयच्या एका सूत्राने स्पष्ट केले की, वरुण चक्रवर्तीच्या गुडघ्यांना दुखापत झाल्याने ते चांगल्या स्थितीत नाहीत, त्याला वेदना होत आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार, भारताला अजूनही 10 ऑक्टोबरपर्यंत टी -20 वर्ल्ड कप संघात बदल करण्याची संधी आहे.

त्यामुळे कदाचित वरुणला भारतीय टीममधून वगळण्यात येऊ शकते. वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे टी -20 वर्ल्ड कपमधून वगळल्यास लेगस्पिनर युझवेंद्र चहलला टी -20 वर्ल्ड कप संघात सामील होण्याची संधी असेल.\

टीम इंडियासाठी वाईट बातमी

बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमला वरुण चक्रवर्तीवर मेहनत घ्यावी लागेल, त्याचे गुडघे पूर्णपणे बरे झालेले नाहीत. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, "वरुणचे गुडघ्यांची स्थिती फारशी चांगली नाही, त्याला दुखत होत आहे, पण जर टी -20 वर्ल्ड कप नसता तर भारतीय टीम व्यवस्थापनाने वरुणला खेळवण्याचा धोका पत्करला नसता."

आयपीएलच्या सध्याच्या हंगामात वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये 6.73 च्या अर्थव्यवस्थेत 15 विकेट्स घेतल्या आहेत.

वरुण चक्रवर्ती इंजेक्शन घेऊन खेळतो

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, "केकेआर सपोर्ट स्टाफने वरुणसाठी सविस्तर फिटनेस प्रोग्राम तयार केला आहे, त्याला पेनकिलर इंजेक्शन्सही दिले जात आहेत, जेणेकरून तो चार ओव्हर बॉलिंग करु शकेल. या इंजेक्शन्समुळे वरुणच्या वेदना कमी होतात. त्याचे दुखणे टीव्हीवर दिसत नाही, परंतु तो खूप वेदना सहन करत आहे.

हार्दिक पंड्या वर प्रश्नचिन्ह

तंदुरुस्तीशी झुंज देत असलेल्या हार्दिक पंड्याला वर्ल्ड कप टी 20 संघात सामील करण्यात आले होते, जेणे करुन तो पूर्ण चार षटके गोलंदाजी करु शकेल, पण आयपीएच्या सध्याच्या टप्प्यात फिटनेसमुळे तो फक्त पहिले दोन सामने खेळला नाही. एवढेच नाही तर तो गोलंदाजीही करत नाही. हार्दिकच्या जागी राखीव खेळाडू म्हणून संघात सामील झालेल्या शार्दुल ठाकूरलाही मुख्य संघात समाविष्ट केल्याची चर्चा आहे.

टी -20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

स्टँडबाय: श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर.
प्रशिक्षक: रवी शास्त्री.
मार्गदर्शक: एमएस धोनी.

Read More