Gautam Gambhir Reaction: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) चा रणसंग्राम शेवटच्या स्टेजवर आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल काल (4 मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs australia) यांच्यात दुबईत खेळवेळा गेला. या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) फलंदाजी करताना जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने सामन्यादरम्यान अनेक दमदार शॉट्स मारले. एकवेळस असे वाटत होते की, तो आणखी काही काळ मैदानात राहिला असता तर ऑस्ट्रेलियाचा संघ सहज तीनशेच्या जवळपास पोहोचला असता. पण भारतीय संघाच्या डावातील ३७वे षटक घेऊन मैदानात आलेल्या शमीच्या एका चेंडूचा तो अचूक अंदाज लावू शकला नाही आणि तो आउट झाला.
स्टीव्ह स्मिथची विकेट ही भारतीय संघासाठी खूप महत्त्वपूर्ण होती. तो बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंसह ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित सगळेच आनंदी झाले. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा मूड वेगळाच दिसत होता. गौतमने अगदी अग्रेशनमध्ये प्रतिक्रिया दिली. यावेळी तो काहीतरी बडबडतानाही दिसला. त्याने शिवी दिल्याचे त्याच्या ओठांच्या हालचालीवरून दिसून येत आहे.
हे ही वाचा: IND vs AUS: घटस्फोटाच्या काही महिन्यातच हार्दिकला मिळाली गर्लफ्रेंड? सिक्सरवर दिली खास प्रतिक्रिया,Video Viral
Gautam Gambhir after Steve Smith Wicket #INDvsAUS pic.twitter.com/NGWdTRxkQx
— Vikas Yadav (@VikasYadav66200) March 4, 2025
हे ही वाचा: "मी PM असतो तर, देशाबाहेर हाकलून दिले असते…" योगराज सिंह कोणावर संतापले?
जसा सामना सुरू होण्यापूर्वी अंदाज वर्तवला जात होता. नेमकं तेच झालं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना स्मिथने एकूण 96 चेंडूंचा सामना केला आणि त्यात तो 73 धावा करण्यात यशस्वी झाला. द37व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याची विकेट पडली.
हे ही वाचा: S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार खेळी करत वर्ल्डकपचा वचपा घेतलाय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमघ्ये भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई येथे खेळवण्यात आला. हा सामना 4 विकेट्सने जिंकून भारताने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. गोलंदाजांपासून ते फलंदाजांपर्यंत सर्वांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.