Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बांगलादेशात खेळणार रोहित शर्मा आणि विराट कोहली? टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याबाबत आली मोठी अपडेट

Team India Bangladesh Tour :भारताने बांगलादेश सोबत कोणतेही संबंध ठेऊ नयेत तसेच क्रीडा सामने सुद्धा खेळू नयेत अशी मागणी करण्यात येत होती.  त्यामुळे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला अद्याप भारत सरकारकडून टीम इंडियाला बांगलादेशमध्ये जाऊन खेळण्याची परवानगी मिळालेली नाही. 

बांगलादेशात खेळणार रोहित शर्मा आणि विराट कोहली? टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याबाबत आली मोठी अपडेट

Team India Bangladesh Tour : भारत विरुद्ध बांगलादेश (India VS Bangladesh) यांच्यात 17 ऑगस्ट पासून तीन सामन्यांच्या वनडे सीरिज आणि तेवढ्याच सामन्यांच्या टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. मात्र मागील काही काळात बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर भारताने बांगलादेश सोबत कोणतेही संबंध ठेऊ नयेत तसेच क्रीडा सामने सुद्धा खेळू नयेत अशी मागणी करण्यात येत होती.  त्यामुळे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला अद्याप भारत सरकारकडून टीम इंडियाला बांगलादेशमध्ये जाऊन खेळण्याची परवानगी मिळालेली नाही.

30 जून रोजी शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियमवर 19 व्या बोर्ड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी BCB चे अध्यक्ष अमीनुल इस्लामने मीडियाशी बोलताना म्हटले, 'आपली बीसीसीआय सोबत सकारात्मक बोलणी सुरु आहे. हे गरजेचं नाही की आम्ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्येच सीरिज करू. आम्ही याविषयी बोलणी करतोय की या सीरिजचं आयोजन कसं केलं जाऊ शकतं. जर आता शक्य नसेल तर आम्ही थोड्या कालावधीनंतर याचं आयोजन करू. बीसीसीआय आपल्या सरकारकडून परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे'. 

विराट कोहली आणि रोहित शर्मा बांगलादेशला जाणार? 

भारत विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये मागच्यावर्षी 2024 मध्ये तीन सामन्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात आली होती. ही सीरिज खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ भारतात आला होता. मात्र यात टीम इंडियाचंच वर्चस्व राहिलं आणि भारताने हा सामना 3-0 ने आघाडी घेऊन जिंकला. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणारी ही टी 20 सीरिज पहिली टी 20 सीरिज ठरली असती ज्यात भारतीय संघ बांगलादेशमध्ये जाऊन सामने खेळणार होता. विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दोघे आता फक्त वनडे फॉरमॅटमध्येच खेळणार आहेत. भारत - बांगलादेश यांच्यात टी 20 सीरिज आणि वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. तेव्हा बांगलादेशमध्ये वनडे सीरिज खेळण्यासाठी भारत सरकारने बीसीसीआयला परवानगी दिल्यास रोहित आणि विराट टीम इंडियाससोबत बांगलादेश दौऱ्यावर जातील. 

हेही वाचा : IND VS ENG : दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पाऊस बनणार व्हिलन? Weather Report ने वाढवलं टेन्शन

भारत विरुद्ध बांग्लादेश वनडे सामन्याचं वेळापत्रक : 

पहिला वनडे सामना – 17 ऑगस्ट, मीरपुर
दुसरा वनडे सामना– 20 ऑगस्ट, मीरपुर
तिसरा वनडे सामना– 23 ऑगस्ट, चटगांव

भारत विरुद्ध बांग्लादेश टी 20 सीरिजचं वेळापत्रक : 

पहिला टी 20 सामना – 26 ऑगस्ट, चटगांव
दुसरा टी 20 सामना – 29 ऑगस्ट, मीरपुर
तिसरा टी 20 सामना – 31 ऑगस्ट, मीरपुर

Read More