Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण! सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे भव्य कार्यक्रम

वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात एमसीए रविवारी कॉफी टेबल बुक आणि टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. यापूर्वी एमसीएने मुंबईच्या सर्व ग्राउंड्समना सन्मानित देखील केलं होतं.

वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण! सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे भव्य कार्यक्रम

Wankhede Stadium : मुंबईतील सर्वात जुन्या स्टेडियमपैकी एक असणाऱ्या वानखेडे स्टेडियमला यंदा 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वतीने रविवारी 19 जानेवारी रोजी भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात एमसीए रविवारी कॉफी टेबल बुक आणि टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. यापूर्वी एमसीएने मुंबईच्या सर्व ग्राउंड्समना सन्मानित देखील केलं होतं.

वेस्ट इंडिज विरुद्ध खेळवला गेला पहिला सामना : 

23 जानेवारी 1975 रोजी या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजकडून 201 धावांनी पराभव झाला होता. ज्यामध्ये क्लाइव्ह लॉईडने नाबाद 242 धावा केल्या होत्या. 1975 मध्ये भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या मन्सूर अली खान पतौडी यांचा हा शेवटचा सामना होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर हा कधीकाळी वानखेडेवर बॉल बाय म्हणून होता. 

वानखेडे स्टेडियम वर्ल्ड कप विजयाचा साक्षीदार : 

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्व महत्त्वाच्या घटना वानखेडे स्टेडियमवर घडल्या आहेत. वानखेडे स्टेडियमचा इतिहास पाहिला तर, 1983 मध्ये जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा टीम इंडिया आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथेच आली होती. 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारतीय  संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा टीम इंडिया विजयोत्सव साजरा करण्यासाठी येथे आली होती. 2011 मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या वनडे वर्ल्ड कपचा फायनल सामना भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकून वर्ल्ड कपवर नाव कोरले. तर 2024 मध्ये देखील रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यावर भारतीय संघ विजयोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचीच निवड करण्यात आली होती. 

भव्य कार्यक्रमांचे आयोजन : 

वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात संगीतकार जोडी अजय अतुल आणि गायक अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर भारतीय क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, डायना एडुलजी, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. 

Read More