Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Karun Nair: करुण नायरचं करियर संपलं? टीम इंडियाकडून आले मोठे वक्तव्य

Team India breaks silence on Karun Nair: करुण नायरची कारकीर्द संपली का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात अजूनही सस्पेन्स आहे. तथापि, टीम इंडियाकडून करुण नायरबाबत एक मोठे विधान आले आहे.   

Karun Nair: करुण नायरचं करियर संपलं? टीम इंडियाकडून आले मोठे वक्तव्य

Team India breaks silence on Karun Nair's omission for Manchester Test:  इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सुमार कामगिरीनंतर करुण नायरला अंतिम अकरातून वगळण्यात आलं असून, त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पुन्हा एकदा चर्चेचा सूर रंगला आहे. मात्र, टीम इंडियाच्या कडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात करुण नायरला अंतिम संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, "करुण नायरचा आंतरराष्ट्रीय करियर संपलाय का?"

फलंदाजी कोचांचं स्पष्ट मत काय? 

चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत भारताचे बल्लेबाजी कोच सितांशू कोटक यांनी नायरच्या वगळण्यामागील कारणावर भाष्य केलं. त्यांनी सांगितलं, "कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर या निर्णयावर सविस्तर बोलू शकतात. मात्र, जेव्हा शुभमन गिल म्हणाले की आम्ही करुण नायरला 'बॅक' करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा नव्हता की त्याला लगेच डावललं जाईल. करुण नायरने वाईट खेळ केला नाही. त्याला अनेक वेळा चांगली सुरुवात मिळाली होती."

हे ही वाचा: करुण नायरची कारकीर्द संपली ? कॅमेऱ्यासमोर ओक्साबोक्शी रडताना दिसला क्रिकेटपटू, के.एल. राहुलने दिला आधार

 

संधी मिळूनही अपयश स्पष्ट?

करुण नायरला 8 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची संधी मिळाली. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने 6 डावांत केवळ 0, 20, 31, 26, 40 आणि 14 धावा केल्या. त्यामुळे तो भारतासाठी विश्वासार्ह क्रमांक-३ चा फलंदाज सिद्ध होऊ शकला नाही. साई सुदर्शन आणि करुण नायर या दोघांचीच कामगिरी अपुऱ्या ठरल्याने, भारत अजूनही नंबर-३ साठी योग्य पर्यायाच्या शोधात आहे.

हे ही वाचा: IND vs ENG: अंशुल कंबोजच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाचं नुकसान, रवींद्र जडेजा संतापला! Video Viral

 

भारत मँचेस्टर कसोटी वाचवेल का?

चौथ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 174 धावा केल्या असून, अजूनही 137 धावांनी पिछाडीवर आहे. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन बाद झाल्याने भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. मात्र, केएल राहुल (87) आणि शुभमन गिल (78)** या दोघांनी अप्रतिम भागीदारी करत उर्वरित 62.1 षटकांमध्ये इंग्लंडला एकही यश मिळू दिलं नाही.

Read More