IND VS ENG : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 20 जून पासून 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. मात्र त्यापूर्वी भारताचा ए संघ इंग्लंड लायन्स संघासोबत दुसरा सराव टेस्ट सामना शुक्रवार 6 जून पासून सुरु झाला यात, संघाचं नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन करत आहे. या सामन्यादरम्यान भारताचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला सातव्या ओव्हरला अंपायरने बाद म्हणून घोषित केले. परंतु यशस्वी यावरून मैदानात अंपायरशी वाद घालायला लागला.
शुक्रवार पासून सुरु झालेल्या अनऑफिसियल टेस्टमध्ये इंग्लंड लायन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. यावेळी भारताने प्लेईंग11 मध्ये काही बदल केले, ज्यात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालला सलामी फलंदाज म्हणून पाठवण्यात आलं. त्यामुळे असं देखील मानलं जातंय की, 20 जून पासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये हेच दोघे सलामी फलंदाजीसाठी उतरू शकतात.
हेही वाचा : अनुष्कासोबत विराटच्या बहिणीचं नातं कसं आहे? ट्रोल होताच म्हणाली...
Jaiswal lbw 17 to Woakes … not sure he necessarily agreed with the decision pic.twitter.com/b3w7dHP5uA
June 6, 2025
यशस्वी जयस्वाल आणि अंपायर यांच्यात वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा मैदानात इंग्लंडचा ऑलराउंडर क्रिस वोक्सने यशस्वी जयस्वालला बाद केले. यशस्वी 26 बॉलमध्ये 17 धावा करून बाद झाला होता. क्रिस वोक्सने टाकलेला बॉल वेगाने आतमध्ये आला आणि फलंदाजाच्या पॅडवर जाऊन लागला. परंतू बघताना बॉल लेग साइडला जाताना दिसत होता. परंतू अंपायरने जयस्वालला बाद निर्णय दिला. बाद निर्णय दिल्यावर जयस्वाल अंपायर जवळ गेला आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. हा सराव सामना असल्याने डीआरएस उपलब्ध नव्हता ज्यामुळे अंपायरचा निर्णयच अंतिम राहिला आणि यशस्वीला मैदानात सोडून जावं लागलं. यशस्वी जयस्वाल हा इंग्लंड दौऱ्यात भारताचा महत्वाचा खेळाडू आहे. तेव्हा त्याचा फॉर्म हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. यशस्वीच्या विकेटनंतर पावसाच्या आगमनामुळे सामना काहीकाळ थांबवण्यात आला होता. मात्र काही काळाने पाऊस थांबला आणि सामना पुन्हा सुरु करण्यात आला. 37 व्या ओव्हरला 133 धावांवर 3 विकेट अशी होती.