Marathi News> टेक
Advertisement

मोबाईल नंबरमध्ये 10 अंकच का असतात? 99% लोकांना उत्तर ठाऊक नाही

10 Digit Mobile Number: दर दुसऱ्या माणसाच्या हातात मोबाईल दिसतो. अशा या प्रत्येक मोबाईलमध्ये असणाऱ्या सिमकार्डचा नंबर किती रंजक आहे तुम्हाला माहितीये? 

मोबाईल नंबरमध्ये 10 अंकच का असतात? 99% लोकांना उत्तर ठाऊक नाही

10 Digit Mobile Number: हल्ली मोबाईलचा वापर अगदी सर्रास केला जातो आणि याच माध्यमातून अनेक कामं अगदी सहजपणे साध्य होतात. या मोबाईल नंबरसंदर्भातील एका महत्त्वाच्या गोष्टीचं तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? 

भारतात मोबाईल नंबर सहसा 10 अंकी असतो. पण, असं नेमकं का? 11 किंवा 12 अंक का नसतात? तुम्हाला कधी हा प्रश्न पडतो का? भारतात 10 अंकी मोबाईल क्रमांक असण्यामागे एक खास कारण असून भारतात एमएनपी म्हणजेच मोबाईल क्रमांक सध्या 10 अंकांचा असला तरीही याआधी मात्र हा नंबर 9 अंकी होता. 

राष्ट्रीय नंबरिंग योजना (National Numbering Scheme) हे या अंकांमागचं मुख्य कारण असून आकडा एक अंकी असेल म्हणजेत 0 ते 9 इतकेच क्रमांक असल्यास फक्त 10 वेगवेगळे क्रमांक तयार होतात आणि 10 जणांनाच हे क्रमांक वापरता येतात. मोबाईल क्रमांक 2 अंकी मोबाईल क्रमांक असल्यास फक्त 0 ते 99 पर्यंत 100 अंक तयार होऊन फक्त 100 लोकच तो वापरु शकतात. 10 आकड्यांच्या हिशोबानं 1000 कोटी विविध मोबाईल नंबर तयार करता येऊ शकतात. ज्यामुळं 130 कोटी जनतेमध्ये विविध मोबाईल क्रमांक वितरित करणं अधिक सोपं ठरतं. 

हेसुद्धा वाचा : महाराणी ताराराणींची समाधी उपेक्षित, समाधीकडं सरकारचं दुर्लक्ष

 

यापूर्वी 9 अंकी होता मोबाईल नंबर... 

सध्याच्या घडीला मोबाईल नंबर 10 अंकी असला तरीही याआधी मात्र तो 9 अंकीच होता. भारतातील लोकसंख्या पाहता ट्रायने 10 अंकी मोबाईल क्रमांक वितरित करण्यास सुरुवात केली. 9 अंकी मोबाईल नंबर सुरू राहिला असता तर, अनेक अडचणी उभ्या राहत मोबाईल वापरणाऱ्यांना ही सुविधा पुरतवा आली नसती. ज्यामुळं हा 10 अंकी मोबाईल क्रमांक अस्तित्वात आला. पुढे 15 जानेवारी 2021 पासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने लँडलाईननं फोन लावताना त्याआधी 0 लावण्याचे निर्देश जारी केले. 

Read More