दूध, दही, पाणी....शिवलिंगावर थंड गोष्टीच का अर्पण केल्या जातात?

Shivraj Yadav
Jun 24, 2025

प्राचीन परंपरा
शिवलिंगावर दूध, दही, पाणी, बेलपत्र यासारख्या थंड गोष्टीच अर्पण केल्या जातात. ही हिंदू धर्मातील प्राचीन परंपरा आहे. यामागील कारण जाणून घ्या.

शिवलिंगाचं महत्त्व
शिवलिंगाला भगवान शंकराचं प्रतिक मानलं जातं. थंड गोष्टी अर्पण केल्यास शंकराची उग्र ऊर्जा शांत होते आणि भक्तांना शांती मिळते.

थंड गोष्टींची निवड
शिवलिंगावर दूध, दही, पाणी, बेलतत्र, ऊसाचा रस अशा थंड गोष्टी अर्पण केल्या जातात. हे सर्व थंड स्वभावाचे आहेत आणि शिवाच्या उग्रतेला संतुलित करतात.

पौराणिक आधार
शिव पुराणात सांगितल्यानुसार, समुद्र मंथनातून निघालेलं विष शंकराने प्राशन केलं होतं. त्यांची उग्रता आणि उष्णता शांत करण्यासाठी देवतांनी थंड दूध आणि पाणी अर्पण केलं होतं. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली.

धार्मिक महत्त्व
थंड गोष्टी शुद्धता, शांती आणि भक्तीच्या प्रतिक आहेत. शंकराची उग्र शक्ती शांत करत त्या भक्तांच्या मनाला शांती देतात. शिव आणि भक्तामधील आध्यात्मिक नातं यामुळे मजबूत होतं.

बेलपत्र
बेलपत्राचा शांत स्वभाव शंकराला प्रिय आहे. हे त्रिदेवाचं प्रतिक मानलं जातं. हे अर्पण केल्याने मानसिक शांतता, चांगलं आरोग्य लाभतं.

काय अर्पण करु नये?
शिवलिंगावर तुटलेलं बेलपत्र, घाण पाणी किंवा शिळ्या गोष्टी अर्पण करु नयेत.

ही माहिती मान्यता, धर्मग्रंथ आणि वेगवेगळ्या माध्यमांवर आधारित आहे.

Read Next Story