Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

पुणे ग्रामीण पोलीसांचा मोठा निर्णय! पालखी मार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांवर मद्यविक्री,मासविक्री होणार नाही

पालखी मार्गावर हॉटेल ढाबे येथे मद्यविक्री मासविक्री होणार नाही. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. 

 पुणे ग्रामीण पोलीसांचा मोठा निर्णय! पालखी मार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांवर  मद्यविक्री,मासविक्री होणार नाही

Ashadhi Wari 2025:  जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच उद्या पुण्यनगरीत आगमन होणार आहे. 21 जूनला पुण्यात मुक्काम असणार आहे. यानंतर 23 जून ते 1 जुलै या कालावधीत दोन्ही पालखी ग्रामीण भागात प्रस्थान करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही पुणे सासवड लोणंद मार्गे पंढरपूर येथे जाते तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी ही पुणे ते सोलापूर मार्गाने जावून पुढे रोटी घाट मार्ग चारामती-इंदापूर-अकलून मार्ग पंढरपूर येथे जाते. या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतुक पर्यायी मागांने वळवली आहे तसेच दोन्ही पालखी मार्गावरील हॉटेल, ढाबे येथे पालखी मार्गक्रमण दरम्यान महाविकी व मासविकी होणार नाही  त्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिली. जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 23 जून ते 1 जुलै या कालावधीत दोन्ही पालखी ग्रामीण भागात प्रस्थान करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही पुणे सासवड लोणंद मार्गे पंढरपूर येथे जाते तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी ही पुणे ते सोलापूर मार्गाने जावून पुढे रोटी घाट मार्ग चारामती-इंदापूर-अकलून मार्ग पंढरपूर येथे जाते. या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी 2 एडिशनल एसपी, 10 डीवायएसपी, 35 पीआय, 136 पीएसआय, 1624 पोलीस अंमलदार, 10 ट्रॅफिक अधिकारी, 110 ट्रॅफिक अंमलदार, 1187 होमगार्ड, 02 आरसीपी पथक, 2 एसआरपीएफ कंपनी, 2  क्यूआरटी पथक तैनात असणार आहे. तसेच दोन्ही पालखी सोहळयाचे मार्गावर इतर जड अवजड वाहनांचा अडथळा होवू नये व पालखरी सोहळा सुखरूपपणे मार्गस्थ होणेकरीता एकूण 12 ठिकाणी विशेष पोलीस अधिकारी व वाहतूक अमंलदार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व पालखी मार्गावर कोणतीही अनावश्यक वाहने येवू नये व वारकरी, नागरीकांना सुविधा व्हावी यादृष्टीने वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी गिल्ल यांनी दिली.

दोन्ही पालखी मार्गावरील हॉटेल, ढाबे येथे पालखीमार्गक्रमण दरम्यान मद्यविक्री व मासविक्री होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशान्वये तसे आदेश प्राप्त करून घेण्यात आले असून त्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये याकरीता प्रत्येकी 15 अमंलदार याप्रमाणे 30 अमंलदार यांची साधेवेषात पोलीस स्टेशन व जिल्हा विशेष शाखा यांचे संयुक्त पथक नेमण्यात आले आहे. 

वारकऱ्यांच्या साहित्यांची चोरीची घटना घडू नये करीता स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, पुणे ग्रामीण यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तैनात करणेत आलेले आहेत. तसेच निर्भया पथक दोन्ही पालखी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांचे सुरक्षिततेत्या दृष्टीने हरितवारी मार्गावर शक्ती अभियान अंतर्गत महिलांचे ०२ विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे.आणि दोन्ही पालखीचे रथामधील माऊलींचे दर्शन घेण्यासाठी मार्गावरील पुरुष व महिला भाविक मोठया प्रमाणात येत असतात अशा वेळी गुन्हे अथवा चैन स्नॅचिंगची घटना घडू नये याकरीता वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी व नागरीकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.तसेच आरोग्य पथक वारीमध्ये नेमणेत आलेल्या आरोग्य पथकाचे मदतीकरीता 02 पोलीस पथके तयार ठेवण्यात आलेले आहे.तसेच पालखी सोहळा जसजसे पुढे जाईल त्या मार्गावरील साफसफाई करीता जिल्हा परिषद, पुणे यांचेकडून नेमणेत आलेले पथकांना समजण्यासाठी पोलीस नेमण्यात आलेले आहेत.अशी माहिती देखील यावेळी गिल्ल यांनी दिली.

 

Read More